शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक उन्नती साधावी – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे
लातूर ( जिमाका ) कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. यात बीजोत्पादन कार्यक्रम, औजारे बॅंक, मधूमक्षिकापालन, रेशीम उद्योग, बीजप्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया उद्योग असे शेतीपूरक व्यवसाय उभारुन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधली आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या लातूर तालुक्यातील बाभळगावचे प्रगतशील शेतकरी दशरथ देशमुख यांच्या रेशीम उद्योगास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी तूती लागवड, रेशीम कोष निर्मितीसाठीचे शेड, साहित्य याची पाहणी करून कौतूक केले. याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पोकरा योजनेतून तूती लागवड, शेड निर्मिती व साहित्य यासाठी अनूक्रमे 37,500, 126400, 56250 असे एकूण 221100 रुपये एवढे अनूदान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले असून त्यांनी दीड वर्षात आठ वेळा कोष निर्मिती केली असून साधारणतः एका बॅचमधून 50,000 हजार ते 60,000 हजार रुपये मिळविले आहेत अशा प्रकारे आजपर्यंत चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून कूटूंबातील सर्व सदस्यांना वर्षभर रोजगार मिळतो म्हणून सर्व शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले. याप्रसंगी लाभार्थी शेतकरी दशरथ देशमुख म्हणाले की, पोकरा योजनेतून दोन वर्षांपूर्वी तूती लागवड करून आम्ही कोष निर्मिती करू लागलो. कोष जालना, मूरूड, रामनगर येथे विक्री केली यातून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कूटूंबातील सर्व सदस्यांना वर्षभर रोजगार मिळाला यातून आमची आर्थिक परिस्थिती सूधारली.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी सचिन कडवकर, कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे, ओमप्रकाश चिंताले, कृषी सहाय्यक प्रियंका गिरी, प्रगतशील शेतकरी राम देशमुख, दशरथ देशमुख, कपिल तोडकर, उमेश देशमुख, संतोष चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.