अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा आंदोलन करू-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा इशारा
लातूर -लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील रावण कोळा, मरसांगवी अतनुर या गावाला अतिवृष्टीचा तडाका बसल्याने पिकाचे नुकसान झाले असून त्यात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याची नासाडी झाली आहे पत्रे उडून गेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधव खुप अडचणीत आले असून शेतकऱ्यांना तातडीने सरकारनी मदत करावी अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या नेतृत्वाखाली कोंग्रेसचे पदाधिकारी शेतकरी बांधव यांनी बुधवारी जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर- घुगे यांच्या कडे निवेदन दीले असून याबाबत तातडीने राज्य सरकारनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत करावी अन्यथा आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शिलाताइ पाटील, जळकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, जळकोट काँग्रेसचे शहर अध्यक्ष महेश धुळशेट्टे, मांजरा साखर कारखान्याचे संचालक अशोकराव काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख,ओबिसी सेल चे प्रा. एकनाथ पाटील, मीडिया सेल चे हरिराम कुलकर्णी, सोशल मीडिया चे प्रवीण सुर्यवंशी, ग्राहक सेल चे सोनू डगवाले, बालाजी साळुंखे,आशिष राजुरकर उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने जळकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५० हजार रुपये मदत करावी, दुबार पेरणीसाठी प्रती हेक्टर ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी तसेच पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांच्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, पिकांची नुकसानी द्यावी,२०२१- २२ रब्बी पीक विमा अद्याप मिळाला नाहीं तो तात्काळ द्यावा , पुरात वाहून गेलेल्या किशन रामा आडे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे निवेदनावर मन्मथ किडे, व्यंकट केंद्रे, सत्यवान पाटील, राजीव चव्हान विश्वनाथ इंद्राळे, बालाजी सुर्यवंशी, संग्राम कांबळे, बालाजी बनसोडे धनराज पाटील, चंद्रकांत कांबळे रमेश सुर्यवंशी, दत्ता पवार,श्रीनिवास मंगनाळे,संभाजी कोसंबे, प्रमोद दाडगेचंद्रकांत कांबळे, राजेश मालेवाड,सुधाकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते