• Thu. Jun 19th, 2025

शिक्षकाची नैतिक संपन्नता हीच खरी श्रीमंती – डॉ.  आर.डी. कांबळे

Byjantaadmin

Jul 24, 2023
शिक्षकाची नैतिक संपन्नता हीच खरी श्रीमंती – डॉ.  आर.डी. कांबळे
निलंगा: शैक्षणिक क्षेत्र हे एक आदर्श क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तेंव्हा या क्षेत्रात काम करत असताना नैतिक आचारसंहिता पाळणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे शिक्षक म्हणून कार्य करत असताना शिकवता शिकवता ज्ञानी बनले पाहीजे, आपल्या ज्ञानामध्ये बदल करत असताना नवतंत्रज्ञान आत्मसात करता आले पाहिजे शिकणे हा शिक्षकाचा खरा गुणधर्म होय. शिक्षक म्हणून स्वतःला अद्ययावत ठेवत असतानाच वर्गातील आपले आचार विचार आणि आपले जीवन यात एकवाक्यता असली पाहीजे. तरच समाजात शिक्षक म्हणून आपल्याला प्रतीष्ठा लाभते. म्हणून आपल्या अंगी आर्थिक संपन्नतेपेक्षा आपल्यामध्ये नैतिक संपन्नता निर्माण करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी प्रतीपादन केले. ते निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय व औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व्यावसायिक आचारसंहिता या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षकाने जात, धर्म, वंश, प्रांत राजकीय वा सामाजिक संस्था संघटनांच्या विचारांबद्दल निरपेक्ष असले पाहीजे. शिक्षकाने विद्यार्थी विवेकी बनवण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
 या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भागवत पौळ हेही उपस्थित होते त्यांनी याप्रसंगी शिक्षकांनी आपली व्यावसायिक आचारसंहिता पाळत असताना कामात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता इत्यादि गुण वृध्दिंगत केले पाहिजेत. त्याचबरोबर व्यवसायात असलेल्या विविध वयोगटांतील सहकारी मित्रांसोबत सहचर्याची भावना बाळगली पाहीजे, मार्गदर्शक म्हणून आपली भुमिका योग्य असली पाहीजे असे मत व्यक्त केले.
    या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. धनंजय जाधव हे उपस्थित होते. तर समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य सिध्देश्वर पाटील यांनीही यावेळी शिक्षकी व्यवसायात आचारसंहीतेचे महत्व प्रतीपादन केले. या कार्यशाळेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने करण्यात आले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ.  गोविंद शिवशेट्टे, डॉ.  नरेश पिनमकर यांनी केले तर आभार प्रा. शिवरुद्र बदनाळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.  शरद उसनाळे,  प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. अभिमन्यू गंगाजी, श्री नामदेव गाडिवान, श्री  ज्ञानेश्वर खांडेकर, श्री प्रकाश सुरवसे, श्री  गणेश वाकळे यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *