• Thu. Jun 19th, 2025

मणीपूर येथील महिलावरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी लातूर शहर महीला काँग्रेसकडून केंद्रसरकारला निवेदन घटनेचा तीव्र शब्दात केला निषेध

Byjantaadmin

Jul 24, 2023

मणीपूर येथील महिलावरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी लातूर शहर महीला काँग्रेसकडून केंद्रसरकारला निवेदन घटनेचा तीव्र शब्दात केला निषेध

लातूर प्रतिनिधी : सोमवार २४ जूलै २०२३ : भाजपचे सरकार असलेल्या मणिपूर राज्यात मागील काही महिन्यापासून दोन समुदायामध्ये दंगली सुरु आहेत. मणिपूरमध्ये या माध्यमातून दंगल, विशीष्ट समाजाच्या हत्या, महीलावरील बलात्काराचे सत्र सुरु आहे. या दुदैवी घटनेवर देशभरातुन संताप व्यक्त होत आहे. भाजपच देशातील केंद्रसरकार व मणीपूर राज्यातील सरकार झोपेचे सोंग घेतलेले जागे होत नाही. बेटी बचावचा नारा देणारे केंद्रसरकार अशा घटना रोखण्यात अपयशी ठरले आहे, देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नीवर अत्याचार होतोय, तिथे सामान्य महिला कशी सुरक्षित राहील, अशा घटनेने देशाची मान खाली जात आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. या घटनांचा निषेध करून तेथील महीलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करून पिडीतांना न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर  येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्फत लातूर शहर महीला काँग्रेसकडून केंद्रसरकारला निवेदन देण्यात आले तसेच या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी लातूर शहर महिला काँग्रेस कमिटी शहर जिल्हाध्यक्ष, लातूर मनपाच्या प्रथम महापौर, तथा माजी चिटणीस प्रा.डॉ.स्मिता कैलास खानापूरे, प्रदेश उपाध्यक्ष विदया पाटील, प्रदेश सरचीटणीस सपना किसवे, स्वाती जाधव पाटील, स्वंयप्रभा पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना लातूर शहर महीला काँग्रेसकडून सोमवार दि. २४ जूलै रोजी दुपारी निवेदन देण्यात आले. मणीपूर राज्यात सशस्त्र जमावाने महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याची अतिशय निंदणीय व मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली. ही निदंनीय घटना घडून गेल्या दोन महीन्यापेक्षा अधिक काळ झाला तरी सुध्दायावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन समाजात द्वेष व शत्रुत्वाचीभावना टोकाला पोहचली असतांना केंद्र व मणीपूर सरकारने कोणतेही प्रभावी पाऊल उचलले नाही. या घटने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून संताप व्यक्त करावा लागला. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्फत लातूर शहर महीला काँग्रेसकडून केंद्रसरकारला देण्यात आले आहे.
यावेळी असिफ बागवान, नागसेन कामेगावकर, इम्रान सय्यद युनुस मोमीन, अभिजीत इगे, सायरा पटेल, संभाजी सुळ, अभिजीत पतंगे, शीतल मोरे, सुकेशनी गोडबोले, सुलेखा कारेपूरकर, पूजा येलगटे, शोभा ओव्हाळ, कमल शहापुरे, अनिता रसाळ, सुनीता डांगे, मेहेर शेख, सुमन चव्हाण, खाजामीया शेख, प्रा.प्रविण कांबळे, बबन सोलंकर, रमेश सुर्यवंशी, यशपाल कांबळे, धर्मवीर सुर्यवंशी, सोमेन वाघमारे, पवनकुमार गायकवाड, बब्रूवान गायकवाड, अतुल गायकवाड, राहूल डुमणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *