लातूर शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतीच्या संदर्भाने काळजी घेण्याबाबत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून सूचना महापालिका प्रशासनाकडून सक्रिय कार्यवाही सुरू
लातूर प्रतिनिधी:लातूर शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतीमुळे पावसाळ्याच्या दिवसात निर्माण झालेला धोका लक्षात घेता महापालिकेने तातडीने योग्य ती कारवाई
करावी व संभाव्य नुकसान टाळावे, अशा सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आयुक्तांना पत्र पाठवून दिल्या आहेत. या सूचनांची दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. लातूर शहरातील गाव भागात व बाजारपेठेत अनेक जुन्या व शंभर वर्षापुर्वीच्या ईमारती आहेत. त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या ईमारती दगडी बांधकामाच्या असून त्यांचा काही भाग हा कोसळलेलाही आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात अशा जीर्ण झालेल्या ईमारतींना अधिक धोका असतो. पावसाचे पाणी मुरल्याने अशा जीर्ण ईमारती पडून त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. गावभाग, गंजगोलाई परिसरात असलेल्या अशा जीर्ण व धोकादायक ईमारतीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या ईमारतीबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेळीच तातडीने कारवाई करण्याच्या मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना या अनुषंगाने लातूर मनपाच्या वतीने कार्यवाही करून धोकदायक व जीर्ण इमारती बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सदया पावसाचे दिवस असून राज्यासह मराठवाडयात अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. लातूर शहरात देखील सातत्याने कार्यवाही करून देखील अनेक ठिकाणी धोकादायक व जिर्ण इमारती आहेत. तसेच शहरातील मनपाच्या काही शाळांच्या वर्गखोल्यांच्या छतांना तडे व भेगा पडल्यामुळे यामध्ये पावसाचे पाणी मुरून गळती लागली आहे. तसेच भितीमधुनही पाणी मुरत असल्याने या वर्गखोल्या विद्यार्थ्यासाठी धोकादायक बनत आहेत. वर्गखोल्यांचे छत भिजल्यामुळे छताच्या खपल्या पडुन धोका होण्याचा संभव आहे. वर्गखोल्यांचीही तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणतीही दुर्घटना घडणार नाही. यासाठी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे आणि प्रशासनाला या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या धोकादायक इमारती व त्या लगत राहणाऱ्या नागरीकांनीही काळजी घ्यावी या संदर्भात मनपा प्रशानाने त्यांना सुचीत करावे असेही आमदार देशमुख यांनी सांगीतले आहे. लातूर शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतीमुळे पावसाळ्यात होणारा संभाव्य धोका व मनपा शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती याबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने कार्यवाही सुरू केली असून नागरीकांनीही याला सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.