मुंबई: २०१९ पासून सेवानिवृत्त झालेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (MSRTC)मधील ११० कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना आजपर्यंत सेवानिवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. मागील चार वर्षात सेवानिवृत्त झालेल्या एकूण ८,५०० इतर कर्मचार्यांची थकबाकी २१५ कोटी रुपयांपेक्षा आहे, जी अद्याप दिली गेली नाही.
या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (MSHRC) घेतली आहे. या संदर्भात नुकतीच MSRTC ला नोटीस देखील बजावण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी कोणती पावले उचलली जातील आणि ते किती दिवसांपर्यंत दिले जातील या संदर्भात १४ ऑक्टोबरपर्यंत आयोगासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, हे दुर्दैवी आहे की कर्मचाऱ्यांनी त्यांची थकबाकी मिळव्यासाठी फार प्रयत्न केले, पम त्यापैकी काहींचे निधन झाले. आता त्यांचे कुटुंबियांचे हाल होत आहेत. आम्ही हा मुद्दा MSRTC व्यवस्थापनाकडे उपस्थित केला होता आता आम्हाला आनंद आहे की मानवाधिकार आयोगाने हे प्रकरण स्वतःहून घेतले आहे.
एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही (एमएसआरटीसी) मानवाधिकार आयोगाच्या आदेशांचा आदर करतो. मी आदेशाचा अभ्यास करेन आणि त्यानुसार लवकरच दाखल होणारे प्रतिज्ञापत्र तयार करू.