• Mon. Jun 23rd, 2025

ग्राम स्तरावरील प्रशासनाने शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे ; बांबू लागवडीचा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करावा  –  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

Byjantaadmin

Jul 17, 2023
ग्राम स्तरावरील प्रशासनाने शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे ; बांबू लागवडीचा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करावा  –  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
 लातूर जिल्ह्यासाठी बांबू लागवडीचे 20 हजार हेक्टर उद्दिष्ट
लातूर, (जिमाका):- तलाठी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कृषी सहाय्यक, गट कृषी सहाय्यक, तलाठी इत्यादी ग्राम स्तरावरील प्रशासनात काम करणाऱ्या या लोकांनी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बांबू लागवडीचे 20 हजार हेक्टर एवढे उद्दिष्ट पूर्ण करावे. जसा प्रत्येक क्षेत्रामध्ये लातूर जिल्हा अव्वलस्थानी राहून काम करीत असतो, त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्याचा बांबू लागवडीतही ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या आहेत.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.डी.सी. सभागृहात आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती आहिल्या गाठाळ, तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ संजय करपे आदि. जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कृषी सहाय्यक, गट कृषी सहाय्यक, तलाठी आदि संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची या कार्यशाळे उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने तसेच गावाने बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करुन त्यांच्याकडून बांबू लागवडीसाठीचे प्रस्ताव मागवून घ्यावेत. तसेच त्यांना बांबू लागवडीसाठी आवश्यक असलेलेली माहिती गावपातळीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावासाठी लवकरच नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असे सांगून बांबू लागवडीसाठीसाठी लातूर आणि सातारा या दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. बांबू लागवडीमधून शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. बांबू लागवडीचे काम तात्काळ पूर्ण करावेत असेही त्यांनी सांगितले.
    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल मार्गदर्शन करताना म्हणाले की, जिल्हा परिषदेसाठी ग्रामपंचायतीमार्फत दहा हजार हेक्टरचे उद्दिष्ट सर्व ग्रामसेवकांनी प्रत्येक गावामध्ये किमान दहा हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना बांबू लागवडीबाबत प्रोत्साहित करावे तसेच लातूर जिल्ह्याचे हिरवाईचे व ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त आहे . यासोबतच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासंदर्भात प्रवर्त करण्याबाबतही सूचना केल्या.
      माजी आमदार पाशा पटेल यांनी बांबू लागवडीचे महत्व, त्यागील उद्देश बांबु लागवडीबाबत शेतकऱ्यांना ड्रिपसाठी व रोपांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबतची माहिती दिली.
  आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ संजीव करपे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपला शेजारील देश चीन बांबूची लागवड करतोय. डोंगर असो की डोंगरकडे अशा ठिकाणीसुध्दा बांबूची लागवड करीत आहे. आपल्या देशामध्ये आपण बांबूची लागवड करणे आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये बांबू म्हटलं की, टोपली, सूप आणि मंडपाच्या पलीकडे आपल्या काही आठवत नाही. पण चीन या देशामध्ये हाताने बनविलेल्या सुंदर प्रकारच्या बांबूच्या वस्तू आहेत. आपण जर मनावर घेतलं तर अशा प्रकारचे वस्तू आपण आपल्या देशामध्ये बनवू शकतो. जसे की, पडदे बनविणे किंवा बांबू पासून बनलेले दागिणे तर अशा अनेक गाष्टी चीन या देशांमध्ये गली ४० वर्षेपासून बनत आहेत बांबूच्या पट्ट्या काढून त्याचे बोर्ड बनविता येतात. ते लोक बांबूपासून खेळणी तसेच इतर शोभेच्या वस्तू बनविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. देशामध्ये 136 बांबू लागवडीच्या जाती आहेत. मराठवाड्यात अभ्यास समितीने सहा प्रकारच्या बांबूच्या प्रजातीसाठी वातावरण पोषक असल्याचे सांगितल्याचेही त्यांनी यावेळी विशद केले.
     उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरात आणि देशभरातसुध्दा या संदर्भाने श्री. करपे मार्गदर्शन करीत असतात. खरंतर आजच्या काळामध्ये पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पाहता बांबू लागवड ही किती फायदेशिर आहे त्याचं महत्व जे अहे ते आपल्याला आणखीन भावी काळात हे कळणे आवश्यक आहे. निसर्गाचा समताले ठेवणे ही एक आपली सामाजिक बांधिलकी आहे आहे. लोकांनी स्वत:हून या योजनेची माहिती घेऊन सहभागी होणे अपेक्षित आहे. पण लोकांना या योजनेची माहिती नसते, सर्वसामान्यापर्यंत ती योजनोची माहिती पूर्ण पोहचविण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी, कर्मचारी म्हणून आपली आहे. विशेषत: ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्यासाठीच नव्हे, तर आपल्या भावी पिढीसाठी हे काम करणं खुप महत्वाचे आहे.
प्र. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे म्हणाल्या की, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी बांबु लागवडीबाबत प्रचार प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. यासोबतच बांबु लागवडीचं महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगावे. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपजिल्हाधिकारी ( ई जी एस ) श्रीमती अहिल्या गठाळ यांनी केले. त्या प्रास्ताविकात त्यांनी जिल्ह्यातील बांबू लागवडीसाठी 19 जुलै औसा , 20 जुलै रोजी निलंगा आणि अहमदपूर, 22 रोजी उदगीर येथे होणार असल्याचे सांगून बांबू लागवड कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *