औसा;- आज संपूर्ण महाराष्टातील शेतकरी कष्टकरी जनता व महाराष्ट्र उध्दव ठाकरे यांच्याकडे आशेने बघत आहे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने
तांबरवाडी राजेवाडी तालुका औसा जिल्हा लातूर येथे नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले
दिनांक 15 जुलै 2023 रोजी तांबरवाडी तालुका औसा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक सन्माननीय विश्वनाथ नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रोहिदास चव्हाण यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे औसा तालुक्यातील 105 गावांमध्ये सदरील शिबिर आयोजित करण्यात आलेला असून यावेळी बोलत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेना ही नेहमी सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी संघटना असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आम्हा तमाम शिवसैनिकांचे दैवत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कर्तबगारीमुळे व शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकल्यामुळे या महाराष्ट्रातला शेतकरी शिवसेनेकडे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडे आशेने पहात आहे .आजच्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची अवस्था दयनीय झालेली आहे एकीकडे निसर्ग कोपलेला असून दुसरीकडे शासनाचे धोरण चुकीचं आहे या देशातलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हातात येणार पीक मिळणार उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडत असताना चुकीचे धोरण राबवून परदेशातून आयात करून शेतकऱ्याचे मालाचे भाव पाडण्याचा षडयंत्र आठवत आहे आज कुठेतरी टमाटे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना बाहेरून टमाट्याची मागणी करून शेतकऱ्यांच्या टमाट्याचे भाव पाडून शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचे महापाप केंद्र सरकारने केलेला आहे या केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात आणलेला शेतकरी विरोधी काळा कायदा शेतकऱ्यांनी हाणून पाडल्यामुळे केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातलं सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जे जे काही करता येईल शेतकऱ्याला कसं नागावता येईल शेतकरी भिकेला लागला पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करून सूडबुद्धीने निर्णय घेणाऱ्या सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचं नाही .दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आजही शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र झटत असतात परवा विदर्भातला दौरा झाला संपूर्ण महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या गाठीभेटी सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत आणि यावर काय उपाययोजना करता येतील या शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वचन बद्द आहे या समारंभाचे प्रास्ताविक शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले ते म्हणाले की आज पर्यंत 40 गावांमध्ये हे शिबिर झाला असून हजारो लोकांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आहे एकीकडे सरकार आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र सरकार लोकांची फसवणूक करून राबवत आहे तर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या जबरदस्त रेट्या त्यामुळे आम्ही औसा तालुक्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी सदरील शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकांना सेवा पुरवण्याचे काम करीत आहोत यावेळी उप जिल्हा प्रमुख बजरंग दादा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभरप्रदर्शन मा. तालुका प्रमुख संजय भाऊ यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब असा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे शिवसेना अल्पसंख्यांक औसा सेल चे अध्यक्ष सलीम पटेल तालुका समन्वयक संतोष सूर्यवंशी तालुका सह समन्वयक महादेव साळुंखे,मा. तालुका प्रमुख संजय भाऊ उजळंबे अंबरवाडी से शाखा बंकट बिराजदार तांबरवाडी गावचे सरपंच राधाकृष्ण जाधव उपसरपंच राम बिराजदार पंचायत समितीचे माजी संचालक तथा ज्येष्ठ शिवसैनिक तंटामुक्ती अध्यक्ष दीपक काका बिराजदार महादेव बिराजदार चेअरमन तांबरवाडी बाळासाहेब पाटील रमेश पाटील मा. सरपंच ग्रामपंचायत सदस्य विशाल बिराजदार राम पवार राम पवार दत्ता तावडे दयानंद घोडके मुकेश सुरवसे सुधाकर मुगळे रामेश्वर मुळे मिरज पटेल तसेच तांबरवाडी गावातील शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.