• Tue. Jun 24th, 2025

तरुणीने आवडीने खाल्ले आंबे, क्षणात आजारानं गाठलं, २ दिवसांत मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण

Byjantaadmin

Jul 14, 2023

इंदूर : फळांचा राजा आंबा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण याच आंब्यामुळे एक भयंकर घटना समोर आली आहे. इंदूरमध्ये आंबे खाल्ल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र नगर पोलीस स्टेशन हद्दीतील बिजलपूर इथं राहणाऱ्या एका महिलेचा आंबा खाल्ल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता, त्याचा अहवाल आला आहे. या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.नवभारत टाईम्सशी बोलताना शवविच्छेदन करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचे डॉ. भारत वाजपेयी यांनी सांगितले की, महिलेमध्ये संशयास्पद विषबाधेची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या बाजारीकरणामुळे फळे कार्बाइडने शिजवून अधिक कमाई केली जाते. हे अत्यंत घातक रसायन आहे. म्हणूनच कार्बाइडने शिजवलेल्या आंब्यातही विषारी पदार्थ असू शकतात. हे आंबे खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यूही होऊ शकतो. मात्र, हा आंबा विषारी होता की वेगळा विषारी पदार्थ प्राशन करण्यात आला, हा तपासाचा विषय आहे.

indore news

 

नेमकं काय प्रकरण आहे….

राजेंद्र नगर पोलीस स्टेशन हद्दीतील बिजलपूर इथं राहणारी २३ वर्षीय नवविवाहित अर्चना अलेरिया हिने ८ जुलै रोजी आंबे खाल्ल्यानंतर अचानक आजारी पडली. यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे उपचारादरम्यान १० जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. महिलेचे सासरे बन्सीलाल अलेरिया यांनी सांगितले होते की, त्यांची सून अर्चनाने दुपारचे जेवण केले आणि नंतर आंबे खाल्ले. सायंकाळी पाच वाजल्यापासून त्यांना डोकेदुखी आणि चक्कर येऊ लागली. त्यानंतर त्यांना युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.सासरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी दोन-तीन ठिकाणी सारख्याच घटना समोर आल्या. त्यामुळे हा आंबा विषारी होता, त्यामुळेच हा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं. पोलिसांनी तरुणीच्या घरातून आंबेही जप्त केले असून त्याची फूड लॅबमध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *