नागपूर : राज्य सरकारमध्ये विकास कामांपेक्षा खाते वाटपावर अधिक चर्चा सुरू आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, अशी सध्याची अवस्था असून महाराष्ट्राला हे भूषणावह नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरात केली.
तपास यंत्रणांची भीती दाखवून विरोधकांना गप्प केले जात आहे. कोणाकडे कुठले खाते जाणार याच्याशी जनतेला काही देणेघेणे नाही. सरकार आता मायबाप राहिला नाही. हे शिंदे -फडणवीस आणि पवार सरकार आता जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. अनेक भागांत पेरण्या झाल्या नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. याचे कोणालाच देणेघेणे नाही. राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली पथक करून कृषी केंद्रावर आपलेच अधिकारी पाठवायचे व लुटायचे असे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. कलंक या शब्दावरून भाजपा आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू असताना महाराष्ट्राला भाजपाने कलंक लावून ठेवलेला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.आम्ही आणि राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत राहिलो.AJIT PAWAR आमच्या सोबत कसे करायचे आणि कसे बाणा दाखवायचे हे आम्हाला माहीत आहे. ते आता का चूप आहेत, असा प्रश्न पटोले यांनी केला. सध्या ठाकरे गट व भाजपा यांच्या कार्यकर्त्यांकडूनUDHAV THAKRE फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारणे हे खालच्या पातळीचे राजकारण आहे CONGRESS असे कधीच करत नाही, असा महाराष्ट्र कधी नव्हता. विकास व विचारानेही महाराष्ट्र संपत आहे. याला भाजपा जबाबदार आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
अजित पवारांसह ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर मंत्रीपद आणि विधानसभा-लोकसभेच्या जागांवरुन महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरू शिंदे गटासह भाजपातील अनेक नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे.या सर्व राजकीय घडामोडींनतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या मंत्रालयात मलईसाठी नुरा कुस्ती सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.