राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामिल झाल्यामुळे आता तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे तीन पक्षाचे सरकार सत्तेत असल्यामुळे अंतर्गत वादविवाद होऊ नये, तसेच या तिनही पक्षांमध्ये समन्वय राहण्यासाठी या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीमध्ये एकूण 12 सदस्य काम पाहणार आहेत. या समितीत समन्वय साधण्याचे काम भाजपाचे नेते PRASAD LAD करणार आहेत. भाजपाकडूनBAWANKULE चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेकडून उदय सामंत SAMBHURAJ DESAI , दादा भुसे, राहुल शेवाळे यांचा या समितीत सहभाग असणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि DHANJAY MUNDE यांचा समावेश करण्यात आला आहे.दरम्यान, सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. तर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरी देखील अध्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे खाते वाटप कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.