• Thu. Jun 26th, 2025

खळबळ:सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ‘ते’ 16 आमदार अपात्र, शेवटी निर्णय अध्यक्षांकडे; विधानसभा उपाध्यक्षांचे मोठे विधान

Byjantaadmin

Jul 10, 2023

‘सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते 16 आमदार अपात्र ठरतील’ असे मोठे विधान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अपात्रतेची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात

दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास करून निर्णय दिला जाईल असं सांगितंल होतं. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेची निर्णय प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचं विधान केलं असून माध्यमांना बोलताना ते म्हणाले की, “सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते 16 आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचीत ठरणार नाही” असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय प्रक्रिया तातडीने घेण्यात यावी यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *