हॉटेल राधिका एक्झिक्युटिव्हचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ, यशस्वीतेसाठी दिल्या क्षीरसागर परीवारला शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी :अत्यंत जलद गतीने विकसित होत असलेल्या लातूरची गरज ओळखून सुरू केलेला हा प्रकल्प शहराच्या वैभवात भर घालणारा ठरेल असा आशावाद व्यक्त करून
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी क्षीरसागर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. लातूर शहरातील औसा रस्त्यावर खवय्यांची रुचकर पदार्थांची गरज पूर्ण करण्यासाठी श्री नंदकुमार विश्वनाथ क्षीरसागर यांनी हॉटेल राधिका एक्झिक्युटिव्हची सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते रविवार दि. ९ जुलै रोजी सायंकाळी हॉटेल
राधिका एक्झिक्युटिव्हचा शुभारंभ कार्यक्रम क्षीरसागर मित्र परिवार मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला, या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी हॉटेल राधिका एक्झिक्युटिव्हची पाहणी करून ग्राहकाकरिता असलेली बैठक व्यवस्था, रंगसंगती, हॉटेल मधील फर्निचर व अंतर्गत सजावट याचे कौतुक केले. दरम्यान यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे क्षीरसागर परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. या शुभारंभ प्रसंगी शहाजीभाऊ पवार, गोकुळ माऊली शुगरचे चेअरमन व्ही.पी.पाटील, ॲड. किरण जाधव, व्हा. चेअरमन विजय देशमुख, व्हा. चेअरमन रवींद्र काळे, व्हा.चेअरमन समद पटेल, दिलीप माने, बी.एस.पवार, शाखा प्रबंधक एस.व्ही.सी.बँकेचे विशाल पवार, संजय जाधव, गणेश एसआर देशमुख, कैलास पाटील, बादल शेख, प्रताप पाटील या मान्यवरासह हॉटेल राधिका एक्झिक्युटिव्हचे विश्वनाथ क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी शुभेच्छापर भाषणात बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, अत्यंत जलद गतीने विकसित होत असलेल्या लातूरची गरज ओळखून सुरू केलेला हा प्रकल्प शहराच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पूढे बोलतांना ते म्हणाले, लातूरची वाटचाल आज प्रगतीपथावर आहे. येथील शिक्षण, उदयोग, व्यापार,व्यवसाय, पायाभूत सुविधांची उभारणी सर्व क्षेत्रात झालेली भरभरभराट मधून लातूर नावारूपाला आले आहे, ही लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कतृत्वातून घडले आहे. या कार्यक्रमास एस.आर.उतके, बजरंग मगरूळकर, सी.एन.खानापूरे, मोहनराव भिसे, बी.आर.मोरे, व्यकंटराव देशमुख, प्रभाकर शेटटी, सतीश पवार आदी
उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे नंदकुमार क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, अतुल क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, गणेश भटकर, रामनाथ क्षीरसागर, वैजनाथ क्षीरसागर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक संजय जेवरीकर, सूत्रसंचलन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर आभार राहूल क्षिरसागर यांनी मानले.