दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये तूफान पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज देखील देशात अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली : उत्तर भारतात पावसाने कहर केला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. देशातील अनेक राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून ५१ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याने दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.देशांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला आहे. अनेक नद्यांना पुर आला असून गावे पाण्याखाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाने झोडपून टाकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशातील अनेक शहरांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत देखील आज पावसामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने १५ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसावामुळे घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. येथील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. नोएडा येथेही तूफान पाऊस झाला असून येथील शाळांना देखील आज सुट्टी देण्याच्या निर्णय प्रशासाने घेतला आहे.
पंजाबमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पंजाबमधील काही जिल्हे देखील पाण्याखाली गेले आहेत. चंदीगडमध्ये देखील रविवारी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. आज देखील मोठा पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने आज आणि उद्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश चंदीगढ प्रशासनाने दिले आहेत.
हिमाचल प्रदेशात पावसाने सर्वाधिक थैमान घातले आहेत. पुरामुळे नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. पावसामुळे रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे ११ जुलै पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.