• Thu. Jun 26th, 2025

सहकार शैक्षणीक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील सर्वांना आपलेसे वाटणारे उत्तम प्रशासक माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Jul 9, 2023

सहकार शैक्षणीक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील सर्वांना आपलेसे वाटणारे उत्तम प्रशासक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब

राजकारणात काम करीत असताना राजकारण बाजूला सारून समाजासाठी काही तरी करावे लागते ते आपले कर्तव्य आहे असं समजून समाजातील सर्व घटकांना सावली देणारा नेता लातूर जिल्ह्यातील सहकार, शैक्षणीक, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देवुन लोकांना न्याय देणारे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारे सर्वसामान्य लोकांना सावली देणारा नेता म्हणून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा उल्लेख करावा लागेल हे निर्विवाद सत्य आहे आज दि 9 जुलै रविवारी लातूर येथे त्यांना गुरधाळ येथील मानव विकास बहुदेशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मानवसेवा जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर, जेष्ठ पत्रकार मधुकरराव भावे विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई विलासरावजी देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे त्या निमित्ताने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे

दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मुळे जिल्ह्यात सहकार चळवळ उभारली

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी मागच्या ३५ वर्षात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला इतकेच नव्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या सर्व सहकारी संस्था आज राज्यात टॉप मध्ये सुरू आहेत लातूर जिल्हा बँक असो की मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने असो आज सगळ्या संस्थां पारदर्शकता ठेवून अचूक कार्य करीत प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत या संस्थांचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब आहेत अतिशय काटेकोर पालन करत सर्व संस्था आज चांगल्या चालत आहेत

शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडवली

तीस वर्षापूर्वी लातूर म्हटले की मराठवाड्यातील मागासलेला जिल्हा असे म्हणायचे लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी हा मागास भाग हा शिक्का पुसून काढला जिल्ह्यात सहकारी तत्वावर साखर उद्योग उभारले त्या माध्यमातून दरवर्षी १२०० ते १५०० कोटी रुपये उस गाळप मधून शेतकऱ्यांना मिळू लागले माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज वाटप केले त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आज सुजलाम सुफलाम झालेला दिसत आहे याचे श्रेय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कडे जाते आज जिल्ह्यांतील शेतकरी सुखाने ताठ मानेने उभा आहे आजही जिल्ह्यातील ६७२ गावातील ग्रामीण भागातील शेतकरी कुठेही जावा प्रतेक गावात दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मुळेच आपली शेती सुधारली अस म्हणणारा किमान गावागावात १० तरी शेतकरी आपल्याला मिळतील असे भरीव योगदान साहेबांच राहिलं आहे.

सहकार चळवळ उभारली
जिल्ह्यात ३५ वर्षापूर्वी अवसायनात निघालेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दिलीपराव देशमुख साहेब यांनी पदभार स्वीकारला अतिशय बिकट अवस्था असताना त्यांनी बँकेला गतवैभव मिळवून दिले एकेकाळी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसा नसणारी लातूर बँक आज दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली पगारदार कर्मचाऱ्यांना ४० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करते हे फार मोठे योगदान त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली राहीलेले आहे जिल्ह्यांतील सहकारी पतसंस्था सोसायटी गृहनिर्माण संस्था मजूर संस्था सर्वांना सहकार्य केल्याने त्या संस्था आज टिकून राहिल्या आहेत यामध्ये त्यानी कधी राजकारण केलं नाही

समाजभिमुख राजकारण

दिलीपराव देशमुख साहेब हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सलग तीन वेळा विधान परिषदेत निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक विकासात्मक कार्यात त्यांचा खुप मोठा राहिलेला आहे त्यांनी कार्य करीत असताना राजकारण बाजूला सारून सर्व समाजाना सोबत घेवून त्यांनी कार्य करीत असताना त्यांनी सर्व घटकांना सामावून सावली देण्याचा प्रयत्न केला आहे असे एक सुसंस्कृत राजकारणातील विकासात्मक समाजाला दिशादर्शक ठरेल असे कार्य करणारे सहकारातील दीपस्तंभ आदरणिय दिलीपराव देशमुख साहेब आहेत त्यांचा आज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्याबद्दल थोडक्यात आढावा घेण्याचा माझा प्रयत्न आहे

हरिराम कुलकर्णी
प्रासंगिक
जेष्ठ पत्रकार लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *