राष्ट्रवादीत पडलेली फूट, अजित पवारांचे ३५ आमदारांसह सत्तेत सहभागी होणे या सगळ्या घडामोडींवर शिवसेना (उ.बा.ठा) बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुंबईत दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे होत असतांना तिकडे मातोश्रीवर शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संघटनात्मक बांधणीसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम घेण्याच्या सूचना ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. राज्याचे राजकारणSHIVSENA शिवाय पुर्ण होवू शकत नाही, अशा विश्वास उपस्थितांना देत त्यांनी पदाधिकाऱ्यांना उर्जा दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे सध्या राज्यात राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली आहे.
अनेक दावे – प्रतिदावे केले जात आहेत. परंतु THAKRE कडून राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली असली तरीही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक दृष्टीने विविध बैठका मातोश्रीमध्ये घेतल्या जात आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाचे माजी आमदार व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक संपन्न झाली.
यामध्ये आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवा, निवडणुकीच्या अनुषंगाने संघटना मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करा,अशा सूचना केल्या.
दरम्यान, महाराष्ट्रतील कोणतीच लोकसभा व विधानसभेची जागा शिवसेनेच्या मदतीशिवाय लढता येणार नाही. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आपली संघटना वाढविणार आहे. तसेच, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेत दौरे करणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.