भारतीय जनता पक्षाकडून ऑपरेशन लोटसच्या नावाखाली अफवा, खोटया बातम्या पसरवून राजकीय गोंधळ निर्माण करणे, आमदारांची खरेदी विक्री आणि लोकांनी निवडलेले सरकार पाडणे या विरोधात काँग्रेस पक्षाने शहरात फ्लेक्स लावले आहेत. हे फ्लेक्स नागरिकांत चर्चेचा विषय ठरलेत. महाराष्ट्रात भाजपने प्रारंभी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी शिवसेनेत फूट पाडली. यावेळी खोक्यांचे राजकारण झाल्याचे बोलले जाते. हे सर्व लौकांचा कौल व संस्कृतीच्या विरोधात असल्याची टिका काँग्रेसनेकेली आहे.
शहरामध्ये काँगेस पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विविध भागात फ्लेक्स लावले आहेत. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीमध्ये राजकारणावर व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडण्यात आलेली फूट हा चिंतेचा विषय आहे. याबाबत सामान्य नागरिक अत्यंत संतप्त झाला आहे. या परिस्थितीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये होर्डिंग लावले आहेत.शहरातील महात्मा गांधी रोडवर काँग्रेस भवन, द्वारका चौक, सारडा सर्कल, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, जुने नाशिक अशा विविध ठिकाणी लावलेले हे फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधत आहे.`आता काँग्रेस…म्हणू काँग्रेसच आणू` अशी टॅगलाईन असलेल्या या फलकांबाबत शहराध्यक्ष आकाश छाजेड म्हणाले, भाजप काँग्रेस नेते राहूल गांधी यांना अत्यंत घाबरला आहे. त्यामुळे तो विविध अपप्रचार करीत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली. हे अनैतीक राजकारण लोकांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे या स्थितीत काँग्रेस हाच लोकांसाठी वैचारीक आणि सामान्यांच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे, हा संदेश आम्ही देत आहोत.