लातूर महानगरपालिकेत लोकशाही दिन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेत सोमवार दि.३ जुलै रोजी लोकशाही दिन घेण्यात आला.यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. मनपा स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या अध्यक्षतेत लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी,उपायुक्त मयुरा शिंदेकर,विभाग प्रमुख नवनाथ केंद्रे,सुनील देशपांडे,रावसाहेब कोलगणे,विजयकुमार चव्हाण,अश्विनी देवडे, नंदकुमार तापडे,बंडू किसवे,विजय राजुरे, कलीम शेख,पवन सुरवसे, लालासाहेब जाधव, सतिश टेकाळे,जरीचंद ताकपिरे,रुक्मानंद वडगावे,लक्ष्मण जाधव, नितीन सुरवसे आदी विभाग प्रमुखांची उपस्थिती होती लोकशाही दिनात दोन नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या.या तक्रारींचे निवारण एक महिन्याच्या आत करण्याचे आदेश मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिले. नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनी सादर कराव्यात.या माध्यमातून तक्रारींचे जलद गतीने निवारण करून घ्यावे,असे आवाहनही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी यावेळी बोलताना केले.