• Sun. Jun 29th, 2025

राष्ट्रवादीतले बंड पवार कुटुंबाने ठरवून केले, जयंत पाटील शकुनीमामा

Byjantaadmin

Jul 3, 2023

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत झालेले बंड हे थोतांड आहे. पवार कुटुंबियांनी ठरवून केलेले हे बंड असून या सगळ्या नाट्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शकुनीमामाची भूमिका वठवली असल्याचा गंभीर आरोप (BRS ) बीआरएसचे कदीर मौलाना यांनी केला. बीआरएसमध्ये प्रवेश करण्यापुर्वी अनेक वर्ष कदीर मौलाना हे राष्ट्रवादीत होते, प्रदेश उपाध्यक्ष असतांना त्यांनी पक्षाला रामराम ठोकत बीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

काल राज्याच्या राजकारणात NCP अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भूकंप घडवून आणला. मात्र हा भूकंप नसून पवार कुटुंबियांनी ठरवून केलेला कार्यक्रम असल्याचा दावा मौलाना यांनी पत्रकारांशी बोलतांना केला JAYANT PATIL राज्यात जातीयवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षाने जनतेची दिशाभूल केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा वापर केला आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर काही राजकीय पक्षांनी मते घेतली परंतु तेच आज सत्ते सहभागी झाले आहेत. सध्याची राजकीय उलथापालथ ही SHARAD PAWAR घरामधून ठरवून होत आहे. गेल्या २५ वर्षा पासून मी या पवार घराण्याला पाहत आलो आहे. या घरामध्ये जयंत पाटील हे शकुनीमामा आहेत. तर शरद पवार व अजित पवार हे सगळे एका माळेचेच मणी असल्याचा आरोपही मौलाना यांनी केला.औरंगजेब हा चांगला राजा होता, त्याने त्याच्या राज्यात कोणालाही त्रास दिला नाही. उलट त्याने येथील हिंदू धर्मीयांच्या मंदिराला जागा दिली. तो जातीवादी नव्हता, त्याच्या राज्यात गंगा जमुना व्यवस्था नांदत होती. मात्र आज त्याच्या नावाने राजकारण करण्यात येत आहे, असेही मौलना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *