• Sun. Jun 29th, 2025

राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी: बाळासाहेब थोरात

Byjantaadmin

Jul 2, 2023

2014 पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरातयांनी व्यक्त केली. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंत थोरात यांनी व्यक्त केली. राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics Congress leader Balasaheb Thorat reaction on NCP Ajit Pawar rebel in Party Maharashtra Politics: राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी: बाळासाहेब थोरात 

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आजच्या शपथविधीची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व राज्यघटने करता ही दुर्दैवाची आहे . पुढील काळात देश कसा चालेल हे काळजी वाटण्यासारखे आहे. पक्ष, पद्धत ,विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल, असे त्यांनी म्हटले. मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पहात आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालय जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय असल्याचेही थोरात यांनी म्हटले.भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे .जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहे. त्यांच्या मागच्या वाक्यांची तुलना केली तर किती टोकाची होऊ शकते हे आता जनता पाहत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

भाजप अस्वस्थ…

राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे लोकसभेला 38 आणि विधानसभेला 180 जागा निवडून येण्याचा अंदाज विविध सर्वेनी दिला आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. आगामी काळात सत्ता मिळावी आणि टिकावी याकरता काहीही केले जात आहे. लोकशाहीची मोडतोड होत आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेले हे नक्कीच काळजी वाटणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

जनता आमच्यासोबत…

काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *