राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा घडून आलेला पहाटेचा शपथविधी याचे कवित्व संपता संपत नाही. या शपथविधीवर विविध नेत्यांकडून भाष्य होणे ही थांबत नाही. या पहाटेच्या शपथविधीची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते.नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेव्हा आमचा डबलगेम केला. सर्व काही ठरलं होतं. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेतली. तर फडणवीसांच्या या दाव्यावर शरद पवार म्हणाले होते की, “आम्ही गुगली टाकली आणि ते आऊट झाले, त्यांनीच विकेट दिली. याच पहाटेच्या शपथविधीवर आता खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे.
२०१९ च्या पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न विचारले अस यावर सुळे म्हणाल्या कि, “२०१९ चा शपथविधीबाबत मला काहीच माहिती नव्हती. याचा तपशील मला माहिती नव्हतं. पहाटेचा शपथविधी घडला, याची बातमी मला सदानंद सुळे यांनीच दिली. तेव्हा मी झोपेत होते,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहेसुळे पुढे म्हणाल्या की, ‘मी त्या दरम्यान पक्षातील नेता म्हणून आणि माझा भाऊ या नात्याने दादाशी संपर्कात होते. आमच्या कुटुंबातील सदस्य सर्वच एकमेकांच्या संपर्कात असतात. पण खरंतर मी आता फडणवीसांचे यांचं आभारच मानते. कारण ते खूप छान पद्धतीने बोलले. तीन दिवस आधी पवारांनी मन बदललं, मग आम्ही शपथ घेतली. फडणवीस यांनीच हे मान्य केलं आहे.’दादाच्या मनात तेव्हा काय घालमेल झाली माहित नाही. मी कधी या विषयावर भाष्य केले नाही. मात्र आता घडून गेलेल्या गोष्टींवर किती दिवस बोलणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलायला काहीच विषय नसले तर तेशपथविधी विषय काढतात, असाही टोला सुळेंनी लगावला. एका खासगी वृत्तवाहिनीला सुप्रिया सुळे यांनी नुकतीच मुलाखत दिली होती.