भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी २००० रुपयांच्या नोटा परत घेण्याच्या निर्णयाच्या एका महिन्याच्या आतच दोन तृतीयांश नोटा सिस्टिममध्ये परत आल्या आहेत. १९ मे २०२३ ला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एका पाॅलीसी अंतर्गत ३.६२ लाख कोटी रुपये मूल्याच्या २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.८ जून रोजी आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या पतधोरण आढाव्याची घोषणा करताना शक्तिकांत दास म्हणाले होते की सुमारे १.८ लाख कोटी मूल्याच्या २००० रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत, हे प्रमाण ३१ मार्चपर्यंत चलनात असलेल्या नोटांच्या सुमारे ५० टक्के होते. यातील ८५ टक्के जमा झाल्या असून आणि उर्वरित १५ टक्के नोटा बदलून घेण्यात आल्या.
आतापर्यंत किती नोटा सिस्टिममध्ये आल्या ?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शक्तीकांत दास म्हणाले की, आता ३.६२ लाख कोटी रुपयांपैकी दोन तृतीयांश (३१ मार्च २०२३ पर्यंत) किंवा २.४१ लाख कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा गेल्या आठवड्याच्या मध्यापर्यंत सिस्टममध्ये आहेत. ३० सप्टेंबर २०२३ ही नोटा जमा करण्याची अंतिम मुदत आहे.
अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम नाही
शक्तिकांता दास म्हणतात की, २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. यासंदर्भात काही विश्लेषकांच्या अहवालावर भाष्य करण्यास नकार दिला होता. यात २००० च्या नोटबंदी झाल्यानंतर ग्राहकांचा खर्च आणि तणाव दोन्ही वाढेल असे नमूद केले होते. दरम्यान, चलनातून नोटा बंद झाल्या तरी लीगल टेंडरसाठी त्या चालू राहणार आहेत.