आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर घोटाळ्याचा देखील आरोप केला . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाज वाटली पाहीजे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे त्यांनी केले आहेत. मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनाभवन दादर येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सडकून टीका केली आहे. मुंबईत काल झालेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले. यावरूनही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे.
ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- मुंबई महापालिकेत वेगवेगेळे घोटाळे शिंदे सरकारने केले आहेत. पण आपण मुंबईकरांचे १ हजार कोटी वाचवू शकलो आहोत.
- दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, ते अजूनही शक्य झाले नाही.
- आम्ही 50 रस्ते पूर्ण करु असे आश्वासन यांनी मे महिन्यात दिले.मुंबई पालिकेच्या प्रशासनाने इतकं छोटं टार्गेट सरकारला दिलं. पण आजपर्यंत एकही रस्ता त्यांनी पूर्ण केलेला नाही. त्यात चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हे सरकार काम करत असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
- शिंदे सरकार आणि भाजपने नाले सफाईची पाहणी केली पण आता जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हे तयार नाहीत.
- रस्त्याचा घोटाळा आणि नालेसफाईवर आम्ही वेळोवेळी लक्ष वेधले आहे.
- दरवर्षी आम्ही नाल्याची पाहणी करायचो आणि त्यावर कार्यवाही करायचो. पुरमुक्त मुंबई होण्यासाठी शिंदे सरकारने काय केले? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.