खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते लोकनेते खासदार सुधाकर श्रृंगारे विचार मंच शाखा फलकाचे अनावरण
लातूर,दि.12 : विवेकानंद चौक लातूर येथे लोकनेते खासदार सुधाकर शृंगारे विचार मंच स्थापना करण्यात आला असून लातूर जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते या स्थापनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
या विचार मंचद्वारे सुधाकर शृंगारे यांनी केलेल्या मागील चार वर्षातील कार्याचा आढावा या मंचाद्वारे नागरिकांना कळविले जाईल. यापुढील काळामध्ये मतदारसंघातील प्रभाग व गावागावात लोकनेते खासदार सुधाकर श्रृंगारे विचार मंच शाखा याची उभारणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
खा. सुधाकर शृंगारे यांच्या खासदार फंडातून लातूर शहरांमध्ये केलेली वेगवेगळे विकासकामे या विकास कामाचा सामान्य जनतेला होणारा फायदा याच्या विषयीची माहिती या मंचाच्याद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे. सोबतच कोरोना सारख्या महामारी मध्ये अन्नदानाचे कार्य, रुग्ण व विद्यार्थ्यांना मदत, साहेबांचे समाजकार्यातील योगदान, तिरुपती बालाजी दर्शन पास, रेल्वेच्या मार्फत तात्काळ सुविधा होण्याकरिता खासदारांनी केलेली मदत याविषयीची संपूर्ण माहिती मंचाद्वारे संस्थापक अध्यक्ष तायप्पा कांबळे यांनी दिली. तसेच डॉ. नागोराव बोरगांवकर यांनी भविष्यात या मंचाद्वारे विविध उपक्रम चालवण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत असा मानस व्यक्त केला.
याप्रसंगी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक तायप्पा कांबळे, सचिव डॉ. नागोराव बोरगांवकर, सहसचिव ईस्माईल शेख, उपाध्यक्ष प्रा. राजकुमार मलवाडे, राजन सोनवणे, भरत लोंढे, सौ. ज्योती रसाळे, विवेकानंद चौक शाखाध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष राहुल कांबळे, सचिव रवी कांबळे, सहसचिव लक्ष्मण सूर्यवंशी, सदस्य बस्वेश्वर आष्टांगे, समिर शेख, राधाकृष्ण तिकटे, ईरकर ज्ञानेश्वर, बाळू कांबळे, राहुल गायकवाड, प्रकाश जाधव, ईसाक मोमीन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते लोकनेते खासदार सुधाकर श्रृंगारे विचार मंच शाखा फलकाचे अनावरण
