मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्यात पाणी पिऊनMUMBAI कडे रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांकडून त्यांना जेवणासाठी आग्रह करण्यात आला होता. मात्र, अद्याप जरांगे पाटील जेवताना दिसलेले नाहीत. गेल्या 16 दिवसांपासून जरांगे पाटलांचे उपोषण सुरुच आहे. दरम्यान, रविवारी जरांगे-पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून मी त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने जात असल्याचे जरांगे पाटील यांनी नमूद केले.

कोपर्डीच्या बहिणीला एका रात्रीत न्याय का मिळत नाही?
जरांगे पाटील म्हणाले “त्या रात्री 56 आमदार एकत्र बसले होते. फडणवीसांनी त्यांना सांगितले की, जरांगेंनी समाजाला रास्तारोको करायला सांगितलाय. मराठा समाज मोठा संख्येने जमेन. ही यांची खासगी चर्चा आहे. एका रात्रीत यांनी न्यायालयाने दिलेली तारिख बदलली होती. आम्ही 24 तारखेला रस्ता रोको पुकारला होता. आम्ही पुकारलेला रस्ता रोको यशस्वी होऊ नये म्हणून म्हणून 23 तारिख करण्यात आली. एवढ्या तारखा बदलू शकतात तर कोपर्डीचीही बहिण आमचीचं आहे. ती फडणवीसांनाही बहिणीप्रमाणेच आहे. तिचा निकाल एका रात्रीत कसा लागत नाही? असा सवालही जरांगे (यांनी उपस्थित केला.
शांततेत रास्तारोको केला तरिही गुन्हे दाखल केले
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्रीEKNATH SHINDE आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांना साथ देतात. हे दिसावं म्हणून वेड्यासारखं करतात. देवेंद्र फडणवीसांनी मोठमोठे मराठा नेते यांनी जेरीस आणून ठेवलेत. मी म्हणालो मीच तिथे येतो काय गोळ्या घालायच्यात ते घाला. मराठा आंदोलकांच्या विरोधात पोलिसांचा वापर केला जात आहे. शांततेत रास्तारोको करुनही मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.
एसपींनी सांगितले की, गृहमंत्रालयाचे आदेश आहेत, गुन्हे दाखल करा. मराठ्यांच्या जीवावर मंत्री होतात. सत्ता आणतात आणि मराठ्यांच्या विरोधात काम करतात. मी एवढे नेते आपल्या पक्षात आणलेत. मात्र, आपली सत्ता आणण्यासाठी जरांगे पाटील काटा आहे, असं त्यांना जाणवलय. त्यामुळे 10 टक्के आरक्षणाला माझ्याकडून होकार मिळवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.