• Tue. Jun 17th, 2025

मोदींनी शिर्डीत येऊन विचारलं, शेतकऱ्यांसाठी पवारांनी काय केलं? उद्धव ठाकरेंचं पवारांसमोरच उत्तर

Byjantaadmin

Oct 27, 2023

रायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
शिवसेना आणि शेकापच्या यापूर्वी मारामाऱ्या झालेल्या आहेत. पण, एवढी वर्ष गेल्यानंतर आम्ही एकत्र आलो कारण तेव्हा जे असायचं त्यात व्यक्तिगत विरोध नसायचा, सुडाचं राजकारण नसायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बी. आर. अंतुले यांची देखील मैत्री होती, काही मुद्यांवर मतभेद असायचे पण वैयक्तिक पातळीवर शत्रूत्व नसायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.आता जे राजकारण सुरु आहे विरोधक असेल तर त्याला संपव, सोबत असेल त्यालाही संपव असं चाललेलं आहे. तिकडे जे मी करण सुरु आहे, त्याच्या विरोधात समीकरण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.काल पंतप्रधान महाराष्ट्रात शिर्डीत येऊन गेले. सध्या आरक्षणाचा प्रश्न धुमसतोय त्याच्या बद्दल काहीतरी बोलतील, असं वाटलं होतं. मणिपूरच्या प्रश्नावरही ते काल काही बोलले नाहीत. नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, काल त्यांनी केला नाही. त्यांच्या बाजूला काल कोण बसलं होतं, जनता हे जे काही चालू आहे ते बघत आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं. शरद पवार कृषी मंत्री होते, शिवसेना आंदोलन करत होती. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. देशात पहिल्यांदा कर्जमाफी शरद पवार कृषीमंत्री असताना करण्यात आली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वसामान्य माणसांची ताकद ही सत्ताधारी किती माजला असला तरी त्याला त्यांच्यापुढे झुकावं लागतं. रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव अंतुले यांनी दिला. राजकारणात गद्दारांना टकमक टोक दाखवायची वेळ आलेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही लोकांच्या मतावर निवडून येता, तुमच्यावर काही बला आली की पलिकडे जाता, असं राजकारण शिवाजी महाराजांनी कधी केलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.आग्रा येथे शिवाजी महाराज औरंगजेबासमोर ताठ मानेनं उभे राहिले होते. या मातीत गद्दार कोणी असेल आणि दिल्लीसमोर झुकत असेल त्यांना गाडून टाकलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इंडियाची बैठक भारतभर होणार आहे. आम्ही व्यक्तीच्या विरोधात नाही, वृत्तीच्या विरोधात आहे. भारतमाता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.इंडियाच्या लोकशाही बँकेत लोकशाही वाचवणारे खातेदार कसे वाढतात यासाठी प्रयत्न करत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *