• Wed. Jun 18th, 2025

मनपाच्या स्थापनेला झाली १२ वर्ष  पालिका मुख्यालयात केक कापून वर्धापन दिन साजरा

Byjantaadmin

Oct 26, 2023

मनपाच्या स्थापनेला झाली १२ वर्ष  पालिका मुख्यालयात केक कापून वर्धापन दिन साजरा

 आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचीही वर्षपुर्ती

 

   लातूर/प्रतिनिधी:लातूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होण्याला बुधवारी (दि.२५ ऑक्टोबर)१२ वर्ष पूर्ण झाली.या काळात मनपा प्रशासनाने शहरातील नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे काम केले.बुधवारी मनपा मुख्यालयाय केक कापून पालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.दरम्यान पालिका आयुक्त म्हणून लातूर येथे रुजू झालेले बाबासाहेब मनोहरे यांनाही लातूर येथे येवून १  वर्ष पूर्ण झाले.आयुक्तांनी पदभार  सांभाळताना लातूरकरांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.

   मागील वर्षभराच्या काळात आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी लातूरकरांचे हित जोपासण्याचे काम केले. प्रशासन सांभाळतानाच मूलभूत सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून दिल्या.पाणी,वीज,रस्ते, स्वच्छता याकडे अधिक लक्ष दिले.आधुनिक काळात सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळाव्यात यासाठीही त्यांनी काम केले.यामुळेच मनपाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक झाला.विस्तारत असणाऱ्या शहरातील नागरिकांना सेवा-सुविधा देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून त्यांनी कामकाजात सुसूत्रता आणली.यापुढेही याच पद्धतीने कामकाज करत अधिकाधिक सेवा- सुविधा देण्याचे काम मनपा प्रशासनाच्या माध्यमातून केले जाईल, असे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.

    मनपाने मागील वर्षभरात केलेल्या कामकाजाचा हा आढावा

 पाणी पुरवठा विभाग :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत १.० अंतर्गत हरंगुळ जलशुध्दीकरण केंद्र येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला.लातूर शहर महानगरपालिका, लातूर पाणी पुरवठा विभागा अंतर्गत हरंगुळ जलशुध्दीकरण केंद्र येथे ९०० KVA सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्यात आला असुन त्यामुळे महिन्याकाठी ५ ते १० लक्ष रक्कमेची बचत होणार आहे.

  केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.०  योजना अमृत 2

२.० अभियान अंतर्गत लातूर शहराची २०५७ सालाची लोकसंख्या गृहीत धरुन शहराकरिता पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यांत आला असुन त्याची एकुण किंमत ५४९.३२४६ कोटी एवढी आहे.ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असुन शहराकरिता योजना मंजुर झाल्यास पाणी पुरवठा बळकटीकरणाचे ध्येय व कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेची शाश्वती निर्माण होणार आहे.पाणी पुरवठा सुरळीत करण्यास यामुळे मदत होईल.

अमृत 2.0 अभियान अंतर्गत लातूर शहरातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शहरात भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. त्याची एकुण किंमत 910.16 कोटी एवढी आहे.हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.ही योजना मंजुर झाल्यास शहरातील सांडपाण्याचे  योग्य नियोजन करणे शक्य होईल.

 बायोगॅस वेस्ट टु एनर्जी प्रकल्प :-

लातूर शहर महागरपालिका स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करत आहे.या प्रकल्पाबबात संक्षिप्त माहिती…

अनु क्र. १ बायोगॅस ५ टन प्रतीदिन

२ बायोगॅस १ टन प्रती दिन बायोगॅस १ टन प्रती दिन

३ प्रकल्प वरवंटी खत प्रकल्प वरवंटी खत प्रकल्प जुने स्थळ स्क्रॅप मार्केट झोन ऑफिस,गांधी चौक पाणी टाकी फीड मटेरियल: इडली गृह, हॉटेल्स

प्रस्तावित उपलब्धता ३००-३५० यूनिट वीज निर्मिती ६०-८० यूनिट वीज निर्मिती ६० एल ई डी बल्ब लावून रस्त्या लागत किंवा जवळच्या ग्रीन बेल्ट करिता लावणे. ६०-८० यूनिट वीज निर्मिती ६० एल ई डी बल्ब लावून रस्त्या लागत किंवा जवळच्या ग्रीन बेल्ट करिता लावणे तसेच उर्वरित वीज चार्जिंग स्टेशन करिता वापर करून त्यावर घंटा गाड्या चार्जिंग करिता प्रस्तावित आहेत.

प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

४.बायोगॅस १ टन प्रती दिन क्षमता फ्रूट मार्केट फीड मटेरियल हॉटेल्स, फ्रूट मार्केट मधील टाकाऊ फळ भाज्या ६०-८० यूनिट वीज निर्मिती ६० एल ई डी बल्ब लावून रस्त्या लागत किंवा जवळच्या ग्रीन बेल्ट करिता लावणे तसेच उर्वरित वीज चार्जिंग स्टेशन करिता वापर करून त्यावर घंटा गाड्या चार्जिंग करिता प्रस्तावित आहेत.

  या चार प्रकल्पापैकी बायोगॅस ५ टन व १ टन प्रकल्प कार्यान्वित झाला असुन त्यामुळे महानगरपालिकेला येणाऱ्या वीजबिलात मोठी बचत होत आहे.उर्वरित दोन्ही प्रकल्प लवकरच पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत आहेत.

 

जलपुनर्भरण अभियान:-

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात जलपुर्नभरण अभियान राबविण्यात आले असुन त्यामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व शाळा व मुख्य इमारतीचे जलपुर्नभरण करण्यात आले आहे.शहरातील खाजगी मालमत्तांच्या जलपुर्नभरण अभियानासाठी जनजागृती करण्यांत येत आहे.शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या विंधन विहीरींचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय मार्फत अमृत 2.0 मध्ये Under India Water Pitch Pilot Scale Startup Challenge चालु करण्यांत आले असुन त्यामध्ये शहरी पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणुन नाविन्यपुर्ण सिध्द आणि संभाव्य पर्यावरण अनुकुल तंत्रज्ञान ओळखणे आणि त्यांचा प्रचार करणे राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एकुण 300 विंधन विहीरीचे जलपुर्नभरण करण्याचे काम पुर्ण करण्यांत आले आहे.सदर अभियांनामुळे विंधन विहीरीतून होणाऱ्या पाण्याचे स्त्रोतात वाढ होऊन शाश्वत पाणी पुरवठा शहराकरिता उपलब्ध होऊ शकते.

बांधकाम विभाग :

    लातूर शहर नगरपालिकेचा बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिमान योजने अंतर्गत रस्ते,ड्रेनेज वॉटर व डिव्हायडर सुशोभीकरणासाठी ६८.१८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.ही कामे सुरू झाली असून त्यापैकी ४.७२ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे.

   याशिवाय एलिव्हेटेड सर्विस रिझर्वेशन अँड वॉटर वर्क्स साठी डीपीडीसी मधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेसाठी २०.८६ कोटी रुपयांचा निधी मिळाला.रवींद्रनाथ टागोर पार्क साठी २६.७३ कोटी तर मूलभूत सोयीसुविधा विकास कामांसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून रस्ते व इतर कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी तसेच इतर कामांसाठीही निधी मिळाला असून मनपाने गतीने कामे सुरू केली आहेत.

   शहरातील मुख्य चौकात उभारण्यात येणाऱ्या चबुतऱ्यांचे सुशोभीकरण मनपाने केले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून विविध ठिकाणी आमदार फंडातून बस थांबे उभारण्यात येत आहेत. शहरात ग्रीन बेल्टचा विकास करण्यात आला आहे.बांधकाम विभागाकडून आरोग्य केंद्रांच्या सुसज्ज इमारती बांधण्यात येत आहेत.

 

(आरोग्य विभाग):-

ऑक्टो.2022 ते ऑक्टो 2023 प्रशासकीय निर्णय राष्ट्रीय कार्यक्रम व विविध उपक्रम अंमलबजावणी साठी आयुक्तांनी स्वतंत्र आरसीएच कार्यक्रम अधिकारी यांची नियुक्ती केली.त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रम व विविध उपक्रम अंमलबजावणी मध्ये सुसूत्रता,गतिमानता येण्यास मदत झाली आहे.

 

आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) व आपला दवाखाना :-

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ऑक्टो.2022 ते ऑक्टो 2023 या कालावधीत एकूण 5 आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) चालू करण्यात आले तसेच एक आपला दवाखाना चालू करण्यात आला. याठिकाणी बाह्यरुग्ण सेवा चालू करण्यात आली असून परिसरातील नागरिकांना याचा फायदा होत आहे .

                                “One Birth ……………One Tree”  उपक्रम

लातूर जिल्ह्यात वनराईचे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे.त्यामुळे वृक्षलागवड करणे व लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाची जोपासणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने लातूर शहर व परिसरात वृक्षलागवड व वृक्षजोपासणूकीचे प्रमाण वाढविण्यासाठी लातूर मनपामार्फत “One Birth ……………One Tree”   अर्थात एक जन्म ….एक वृक्षहा विशेष व महत्वाकांक्षी उपक्रम चालू करण्यात आला आहे.

या उपक्रमा अंतर्गत बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या जन्माची आठवण म्हणून आशा स्वयंसेविका यांचे मार्फत घरी जावून वृक्षभेट देण्यात येत आहे.वृक्षलागवड व वृक्ष जोपासणूकीचे भावनिक आवाहन करण्यात येत आहे.यास बाळाच्या पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

बाळाच्या जन्माची आठवण म्हणून वृक्षलागवड करण्यात येत असल्याने वृक्षाशी भावनिक बंध जोडले जावून त्या कुटुंबांमार्फत वृक्षाची जोपासणूक केली जाईल असे अभिप्रेत आहे.

 

मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर :-

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव निमित्त लातूर महानगरपालिके मार्फत या वर्षी प्रथमच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांचे सहकार्याने शहरातील मिरागी नेत्ररुग्णालय व एमआयटी रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले.

   जननी रथ :-

 शहरातील गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय आरोग्य संस्थेत दाखल करणे व प्रसुतीपश्चात वापस घरी नेवून सोडणे यासाठी मनपा मार्फत मोफत वाहन सुविधा (ambulance) उपलब्ध करून देण्याची नाविन्यपूर्ण अशी जननी रथ योजना माहे.मार्च महिन्यामध्ये ती चालू करण्यात आली.सदरील योजनेसाठी मनपा अर्थसंकल्पात सन 2023-24 साठी आर्थिक तरतूद देखील ठेवण्यात आली.

प्रसूतीसाठी शासकीय आरोग्य संस्थेत दाखल करणे व प्रसुतीपश्चात वापस घरी नेवून सोडणे यासोबतच राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत आशा स्वयंसेविका,एएनएम यांचे कडून ज्या पात्र महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे अशा महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी शासकीय आरोग्य संस्थेत दाखल करणेसाठी देखील जननी रथया वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी देखील हा जननी रथ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

      या सर्व बाबींमुळे शहरातील प्राधान्याने झोपडपट्टी,मध्यमवर्गीय कुटुंबे असलेल्या भागातील गरजू महिलांना प्रसूतीसाठी शासकीय आरोग्य संस्थेत दाखल होण्यासाठी जननी रथया मनपाच्या उपक्रमाचा फायदा होत आहे व दिवसेंदिवस हा उपक्रम स्थापित होत आहे .

 

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान:-

लातूर शहरामध्ये सर्वत्र ठिकाणी बेघर,सार्वजनिक ठिकाणी,उघड्यावर, उड्डाण पूलाखाली, इमारतीचा आश्रय घेतात, तसेच मंदिर,मस्जिद, बस,रेल्वे स्थानक येथे वास्तव्यास असणारे आणि त्यांना कसलाच आधार नसलेल्या पुरुष,वृद्ध महिला,मुले व मुली अशा बेघर लोकांसाठी ठाकरे चौक शाळा क्रमांक 04 येथे सुसज्ज अशा नागरी बेघर निवार्यााच्या बांधकामासाठी 1 कोटी 79 लक्ष निधि मंजूर करण्यात आला असून त्यापैकी रु. १ कोटी ४३  लक्ष निधि प्राप्त झाला आहे.जवळपास  ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

लातूर शहरामधील गरीब,गरजू व शहरी गरीब कुटुंबातील महिलांचे 268 बचत गट तयार करून 3500 कुटुंब व महिलांचे संघटन करून या बचत गटांच्या महिलांना रुपये 11 कोटी 67 लक्ष निधि बँकेकडून अर्थसहाय्य करण्यात आले.  

प्रधानमंत्री स्वनिधी योजने (PMSWA NIDHI) अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून 6865 पथविक्रेत्यांचे फॉर्म भरून त्यापैकी 4512 पथविक्रेत्यांना रुपये 4 कोटी 51 लक्ष बँकेच्या माध्यमातून अर्थ सहाय्य करण्यात आले आहे.

 

आस्थापना विभाग :-

 महापालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून जानेवारी २०२३ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला.अनुकंपा तत्त्वावर चौघांना नियुक्ती आदेश देण्यात आले.लाड कमिटी अंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्या. महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी माहितीचा अधिकार व महापालिका अधिनियम या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

 

ग्रंथालय विभाग:‌-

लातूर शहर महानगरपालिका लातूर ग्रंथालय विभागातील साल सन २०२३-२४ मधील उल्लेखनीय कामांची माहीती.

१) मनपाच्या चार झोन मध्ये प्रत्येकी दोन प्रमाणे शहरातील सर्व वाचकांसाठी वाचनकट्टाची निर्मीती करण्यात आली असुन त्याद्वारे प्रत्येक वाचनकट्टा मध्ये १० दैनिक वृत्तपत्रे ठेवण्यात येत आहेत.

२) साल सन २०२३-२४ मध्ये ग्रंथालयाच्या स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्रामधील १३ विद्यार्थी विविध पदावर निवड झाले आहेत.

३) शहरातील अंध वाचकांसाठी ब्रेल लिपीमधील ४० दर्जेदार ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

४) स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी चालू अभ्यासक्रमातील स्पर्धा परिक्षांचे जवळपास ९५० ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

५) साल-सन २०२३-२४ या वर्षात ग्रंथालय इमारतीचे सुरक्षा द्रष्टीकोनातुन CCTV बसविण्याचे काम पुर्ण करण्यात आले असुन इमारतीमध्ये व बाहेरुन असे एकुण १६ कॅमेरे बसविण्यात आले.

६) शहरातील वाचकांच्या सोईसाठी मराठी,हिंदी, इंग्रजी,उर्दू माध्यमातील जवळपास ४५ दैनिक वृत्तपत्र एकाच ठिकाणी वाचकांच्या सोईसाठी उपलब्ध करून दिले असुन जवळपास ५० हजार ते १ लाख वाचकांनी वर्षभरामध्ये याचा लाभ घेतला आहे.

 

भांडार विभाग:-

1.मनपातील फिल्डवर काम करणार्या- सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्यात आले आहेत.

2.स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना गमबुट व हॅन्डग्लोज वाटप करण्यात आले आहेत.

3.ANM,परिचारिका, आरोग्य विभागातील फिल्डवर काम कराणाऱ्या महिला कर्मचारी यांना सनकोट व टोपी वाटप करण्यात आली आहे.

 

प्रधानमंत्री आवास योजना :-

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुर 4808 घरकुलापैकी 2721 घरकुलांची बांधकामे पूर्ण झाली  असुन 1132 घरकुलांची कामे चालू आहेत.

• DPR 10 अंतर्गत 1223 लाभधारकाचा प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविला आहे.

या योजनेअंतर्गत रूपये 103 कोटी 2 लक्ष निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी रूपये 82 कोटी 77 लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.

 

रमाई आवास (घरकुल) योजना :-

महाराष्ट्र-शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेमार्फत अनुदानित अनुसुचित जाती व नवबौध्द- घटकांसाठी रमाई घरकुल योजना लातूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येते.

सदर योजने अंर्तगत शहरातील अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकांतील ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे अशा लाभधारकास योजनेचा लाभ देण्यात येतो.

चालू वर्षात 1013 घरकूलाना मंजूरी मिळाली असुन 481 घरकुलांची कामे चालू आहेत.

चालू वर्षात 25 कोटी 32 लक्ष 50 हजार निधी  मिळाला असुन 6 कोटी 42 लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.

 

स्वच्छता विभाग:-

1. स्वच्छता विभागात 2 वॉटर टँकर खरेदी केले.

2. 3 टन टिप्पर वाहन खरेदी –2 वाहने.

3. स्विपर मशिन खरेदी –20 नग.

4. फिरते शौचालय 8 नग खरेदी – 6 नग उपलब्ध आहेत.

5. वरवंटी कचरा डेपो येथे Bio-Mining प्रकिया चालु आहे.

6. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.

7. वरवंटी कचरा डेपो येथेर घनकचरा प्रक्रियेसाठी 150 TPD Processing Plant उभारणी करण्यात आले.

8. वरवंटी कचरा डेपो 5 TPD बायोगॅस प्रकल्प उभारणी केले.

9. वरवंटी कचरा डेपो येथे 50 टन TPD Construction & Demolition Waste Plant (C&D) प्रकल्प उभारणी करण्यात आले.

 

विरंगुळा केंद्र :-

 शहरातील ज्येष्ठ नागरिकांकरीता दिनांक 01 जुलै 2023 पासून लोकनेते विलासरावजी देशमुख (नाना नानी )पार्क येथे विरंगुळा केंद्र चालू करण्यात आले आहे. तसेच  खोरी गल्ली येथील ग्रीन बेल्ट येथे दुसरे विरंगुळा केंद्रचे बांधकाम सुरु झाले आहे.

 

शहर बस सेवा :-

यशस्वीपणे महिलांसाठी मोफत शहर बस सेवा सुरु ठेवली तसेच ५० इ- बसेस चा प्रस्ताव शसनाकडे सादर केला आहे.

 

  आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेने या सर्व सेवा सुविधा लातूरकर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यापुढेही याच पद्धतीने नागरिकांना सेवा देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *