• Fri. Jun 20th, 2025

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचं श्रेय कुणाचं, अशोक चव्हाणांनी थेट सांगितलं, फडणवीसांच्या आरोपवर म्हणाले…

Byjantaadmin

Oct 20, 2023

नांदेड: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द केला आहे. यावेळी त्यांनी कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाल्याचा आरोप केला. फडणवीस यांच्या आरोपाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या काळात आम्ही उच्चश्रेणीपद कंत्राटी पद्धतीने भरली नव्हती, स्वतःच अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार अश्या प्रकराच्या उच्चश्रेणीतील पदे आम्ही कंत्राटी पद्धतीने भरली नाही. स्वतःच उच्च श्रेणीतील पदे कंत्राटी पद भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता स्वतःच अपयश झाकण्यासाठी काँग्रेसवर खापर फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. चतुर्थश्रेणीची पद कंत्राटी पद्धतीने भरली तर आम्ही समजू शकतो, पण उच्चश्रेणीतील पदे आम्ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा चुकीचा निर्णय घेतला नाही, असं चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळातलं हे पाप असल्याचे फडवणीस म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया देत पाप , पुण्य आता राहिलं कुठ असा चिमटा अशोक चव्हाण यांनी यावेळी काढला. त्यांना काय एक्सपोज करायच हा त्यांचा प्रश्न आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नाही त्यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे असे अशोक चव्हाण म्हणाले.

विद्यार्थ्यांमुळं सरकारला झुकावे लागले

कंत्राटी नोकर भरतीचा जो निर्णय रद्द करण्यात आला आहे, त्याचं खरं श्रेय विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थ्यानी एकत्रित येऊन लढा दिला आहे, त्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेपुढे सरकारला झुकावे लागले, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत

मराठा आरक्षाणसंबंधी नेहमी सकारात्मक बोलतो. आजही काँग्रेसची भूमिका हिच आहे. देशातील जेवढे आरक्षणाचे प्रश्न आहेत, त्यांचा प्रश्न मार्गी लावायाचा असेल तर, ५० टक्क्यांची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिली ती कायद्याने किंवा घटनात्मक बदल करून कायदेशीररित्या नवीन कायदा करून होत नाही तोपर्यंत हा विषय अडचणीचा ठरणार आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे. समाजातील लोकांच्या भावना तीव्र आहेत, सरकारने आरक्षणा देण्याबाबत कबुल केले होते, त्याची अंमलबजावणी करावी, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *