• Wed. Apr 30th, 2025

काँग्रेसच्या काळातच शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत-अशोकराव पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Sep 4, 2023

विलासराव देशमुख परदेशात असताना एक फोन वर पीकविमा मिळाला होता

खबरदार!शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर….

निलंगा-  सध्याचे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही. महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये चाळीस दिवसापासून पाऊस नसल्यामुळे खरिप पीक पूर्णतः वाया गेले आहेत.  शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू, असा इशारा काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी दिला.दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी त्यांना एक फोन केला आणि आठ दिवसात पीकविमा मिळाला होता, अशी आठवणही निलंगेकर यांनी सांगितली पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार संवेदनशील होते. त्यावेळी टंचाईसदृष्य स्थितीत आठव्या दिवशीच पीकविमा मंजूर झाला होता.पाऊस नसल्यामुळे दुष्काळ जाहीर करावा,पीकविमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी, जनावरांसाठी चारा द्यावा, विध्यार्थांची शैक्षणिक फी माफ करावी, विजबिल माफ करावे, भारनियमन करू नये आदी मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पावसाचा मोठा खंड पडल्याने नगदी पिकं हातची गेली आहेत.आता पाऊस पडूनही काहीच उपयोग नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेतील अग्रीम रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी करूनही सरकार गांभीर्याने घेत नाही, असा आरोप अशोक पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाचे लोकशाही पध्दतीने आंदोलन झाले शिवाय ५८ मोर्चे निघाले. त्या दरम्यान कोणतीही घटना अथवा अनुचीत प्रकार घडला नाही.दुष्काळावरचे लक्ष विचलीत करण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न केला गेला. शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच नसेल तर बाजार कसा चालणार? त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका, असे आवाहन निलंगेकर यांनी केले. आपण जर असेच चुकीच्या लोकांना मतदान करून निवडून आणले तर वरचा देव खाली आला तरी तुम्ही वाचणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही, असेही निलंगेकर म्हणाले.

यावेळी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, प्रशिक्षण सेल जिल्हाध्यक्ष चक्रधर शेळके ,सोनु डगवाले, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य पंकज शेळक, प्रा. दयानंद चोपणे, निलंगा पंचायत समिती चे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष लाला पटेल,  ऍड नारायण सूर्यवंशी, ऍड अजित माकणे,अजित नाईकवाडे, असगर अन्सारी,प्रकाश बाचके, ,मुजीब सौदागर, अमोल सोनकांबळे, सुतेज  माने, सिराज देशमुख,शकील पटेल,माधवराव पाटील, महेश देशमुख, सुधीर लखनगावे,भरत बियाणी, गोविंद सूर्यवंशी,दिलीप ढोबळे,
छावाचे तालुकाध्यक्ष  तुळशीदास साळुंके आदी सह मोठ्या संख्येने उपस्थित होते .या मोर्च्याचे आयोजन काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष  डॉ .अरविंद भाताम्ब्रे यांनी केले होते. या आंदोलनात देवणी ,शिरूर अनंतपाळ निलंगा येथील शेतकरी मोठ्या संख्या ने उपस्थित होते .यावेळी दुष्काळ संबंधित मागण्या चे निवेदन  प्रशासनला देण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *