तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अविश्वास ठरावावर आज मतदान पार पडत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारला आज कसोटी सिद्ध करावी लागणार. दरम्यान मतदानाआधी विरोधी सदस्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मोदींवर जोरदार तोफ डागली आहे.”मणिपूर हिंसाचारावरूम मोदी सरकारवर टीकेची ताफ डागत म्हणाल्या, मणिपूरमध्ये ज्या प्रकारची हिंसाचार झाला त्या प्रकारची जातीय हिंसा मागील अनेक दशकांपासून कोणत्याही राज्यात झालेली नाही. मागील तीन महिन्यांत सहा हजार पाचशे एफआयआर मणिपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. असा भीषण प्रकार कोणत्याही राज्याने पाहिलेला नाही. चार हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत, साठ हजार लोक बेघर झाले आहेत, असा प्रकार कोणत्याही राज्याने पाहिला
दरम्यान, अविश्वास ठरावावर आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची आज संसदेत परीक्षा पार पडणार आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर आज मतदान होणार आहे. यामुळे आजच्या या ठरावावरून कुणाकडे किती संख्याबळ हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मोदी राहणार की जाणार? याकडेही देशाचे लक्ष लागले आहे.