• Sat. Jun 21st, 2025

हा सरकारवरचा अविश्वास प्रस्ताव नाही, विरोधकांची परीक्षा आहे; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

Byjantaadmin

Aug 10, 2023

विरोधकांनी गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधीही अविश्वास प्रस्ताव आणला होता, पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांवर अविश्वास दाखवला आणि भाजप-एनडीए अधिक जागा घेऊन सत्तेत आले, त्यामुळे यावेळीही हा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून 2024 सालच्या निवडणुकीत आम्ही नव्या विक्रमासह निवडून येणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हा सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव नसून विरोधकांची परीक्षा आहे असंही ते म्हणाले. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावर ते बोलत होते

narendra modi speech on no confidence motion manipur violence parliament monsoon session marathi news  Narendra Modi Speech: हा सरकारवरचा अविश्वास प्रस्ताव नाही, विरोधकांची परीक्षा आहे; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

आतापर्यंत अनेकदा लोकांना विश्वास व्यक्त केला, त्यांचे आभार मानतो. देव दयाळू आहे, तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करतो. विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. गेल्या वेळी म्हणजे 2018 साली देखील विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. जनतेनेही विरोधकांवर विश्वास दाखवला नाही. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा आम्हाला एक प्रकारचा लाभ असतो. येणाऱ्या निवडणुकीतही एनडीए नवा रेकॉर्ड करून सत्तेत येणार यात शंका नाही.

गेल्या तीन दिवसांपासून या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले मत मांडले आहे., विरोधकांनी मात्र याचं गांभीर्य पाळलं नाही. विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना लोकांपेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता आहे. विरोधकांना जनतेच्या भूकेची चिंता नाही, त्यांच्या राजकारणाची चिंता आहे.मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन द्यावं अशी मागणी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. पण भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर या आधी निवेदन दिलं होतं, पण विरोधकांना पंतप्रधानांकडून याचं उत्तर हवं होतं. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता.

 

पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्दे,

विरोधकांना देवाने सुबुद्धी दिली आणि अविश्वास प्रस्ताव आणला, त्यांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे आमच्यासाठी शुभ संकेत. 2024 साली आम्ही विक्रमी जागांसह सत्तेत येणार.

विरोधकांनी पहिल्यापासून जर गांभीर्याने कामकाजात भाग घेतला असता तर अनेक विधेयक सहमत होऊ शकले असते.

विरोधकांनी फिल्डींग आमच्यासाठी सजवली, पण चौके आणि छक्के आमच्याकडून लागले. तिकडून फक्त नो बॉल पडत राहिले.

ज्यांचे स्वत: चे हिशोब बिघडलेत ते आमच्याकडून हिशोब मागत आहेत.

यावेळी सर्वात मोठ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना भाषण करु दिलं नाही, त्यांचं नावच या यादीत नाही.

काँग्रेसकडे ना नीती आहे ना नियत आहे, इतकी वर्षे सत्ता भोगूनही काँग्रेस अनुभवशून्य.

माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातल्या सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांच्या यादीत असेल.

गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी माझ्याविरोधात जेवढे काही अपशब्द वापरायचे तेवढे वापरले. पण ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्यांचं मन काहीसं हलकं झालं असेल. मोदी तेरी कब्र खुदेगी हा त्यांच्या आवडता नारा आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही गुप्त वरदान मिळालं आहे, ते लोक ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचं चांगलंच होतंय. गेल्या नऊ वर्षात माझ्याविरोधात अनेक गोष्टी केल्या, पण माझं चांगलंच झालं.

देशातील बँकिंग सेक्टर नष्ट होईल, परदेशातून काही लोकांना आणून हे सांगितलं जात होतं. पण आमची सार्वजनिक बँक चांगलं काम करत असून त्यापेक्षा सर्वात चांगलं काम करत आहे.

HAL संदर्भाता विरोधकांनी संभ्रम तयार केला, कर्मचाऱ्यांना भडकवलं. या संदर्भात विरोधकांनी वाईट सांगितल, मात्र HAL पुढे पोहचलयं, रेव्हेन्यू फायद्यात आला आहे.

एआयसीच्या संदर्भात विरोधकांनी संभ्रम तयार केला, मात्र आता एलआयसी कुठच्या कुठे पोहचलयं, यशस्वी होतंय. विरोधक जी संस्था संपेल असं सागतंय ती संस्था मजबूत होते.

देशाला विश्वास आहे, 2028 मध्ये तुम्ही जेव्हा अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर असेल.

देशात काँग्रेसवर जनतेचा विश्वास नाही, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, ओडिशा, नागालँड,  पश्चिम बंगालच्या जनतेने काँग्रेला नाकारलं आहे.  तामिळनाडूत काँग्रेस 1962 मध्ये जिंकली होती, काही दिवसापूर्वी युपीएचा क्रिया-कर्म केलं.

काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय काँग्रेसने मतांसाठी गांधी नावही चोरलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *