मणिपूर प्रकरण, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. यातच केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याबाबत (मंगळवारी) आज दुपारी 12 वाजल्यापासून लोकसभेत कामकाज सुरू झाले असून, ही चर्चा 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. आता या तीन दिवसांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच्या दिवशी उत्तर देण्याची शक्यता आहे.दरम्यान, सभागृहात बोलताना काँग्रेसचे आसमामधील खासदार गौरव गोगाई यांनी पंतप्रधांनांवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूर हिंसाचारावरून त्यांनी पंतप्रधान मोदींनी जोरदार सुनावले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देऊन, त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गोगाई म्हणाले, “आसामा राज्यात कोक्राझारमध्ये या ठिकाणी 2012 साली हिंसाचार घडून आला होता, तेव्हा त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सभागृहात या हिंसाचारावर बोलले होते. पंतप्रधानांनी आसामच्या हिंसाचारग्रस्त भागात जाऊन म्हंटल की,आपण एक राष्ट्र आहोत, आपण एकत्र राहायला हवे, आपण शांतता प्रस्थापित केली पाहिजे. मात्र आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे बोलतील का?
“2002 या साली GUJRAT ध्ये दंगल उसळली होती, तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गुजरातला गेले होते. मात्र आताचे पंतप्रधान modi मणिपूरला गेलेही नाही आणि त्याबद्दल काही बोललेही नाही. पंतप्रधान मोदींनी लोकसभेबरोबरच राज्यसभेतही यावे. त्यांनी manipur ला जाऊन, त्यांच्या दुखात संपूर्णपणे सहभागी आहोत, असा संदेश द्यायला हवा, असे गोगाई म्हणाले.