मुंबई | 25 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजू शकतं. पुढच्या वर्षी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रस पक्षात या महिन्यात फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी आहे तर दुसरा गट विरोधी पक्षात सहभागी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे घडलं ते वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षासोबत घडलं होतं. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दाखल केलेली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.
विधासभा अध्यक्षांकडून या प्रकरणी हवी तशी कारवाई केली जात नाही, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी याबाबत निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनार लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, असा आदेश दिला होता. पण दोन महिने झाले तरी विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई करण्यात आली नव्हती. विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेऊ, असं सांगण्यात येत होतं.
ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं. सुप्रीम कोर्टाने निर्देश देवून दोन आठवडे झाल्यानंतही विधानसभा अध्यक्षांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट आम्ही तीनवेळा कारवाईबाबत निवेदन केलं. पण विधानसभा अध्यक्षांकडून दखल घेतली जात नाही. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली होती. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली.