महाराष्ट्रातील 92 नगरपालिकांसदंर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी मंगळवारी होणार आहे. गेल्या एक वर्षापासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. या प्रकरणाच्या सुनावणीला अनेकदा तारीख पे तारीख मिळत असल्याने आता मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील 92 नगरपालिका आणि जवळपास 15 महानगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षण व बदललेल्या प्रभाग रचनेमुळे कोर्टाच्या कचाट्यात अडकल्या असून या निवडणुकांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला आहे. अनेक दिवसांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे.
या प्रकरणात अनेकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तर अनेकदा कोर्टात युक्तिवाद होऊ शकला नाही. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सुनावणीत तरी हा मुद्द मार्गी लागणार की, पुन्हा यावरील सनावणी पुढे ढकलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.नगरपालिकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला सुनावणीनंतरच समोर येणार आहे. याबरोबरच राज्य सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का?, हे दखील पाहणं महत्वाचं असणार आहे.