रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शालवाडीत भूस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री ११च्या सुमारास या गावावर दरड कोसळली.

अख्खं गाव झोपेत असताना भूस्खलन झालं
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडीमध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. रात्री जवळपास ११च्या सुमारास अख्खं गाव झोपेत असतानाच भूस्खलन झालं. या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० ते २५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
खालापूरजवळ इर्शालवाडी गावात दुर्घटना
खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात रात्री जवळपास ११ वाजता ही भीषण दुर्घटना घडली. इर्शालवाडी हे संपूर्ण गाव झोपलेलं असताना दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. आतापर्यंत ७५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे
-
२० ते २५ जण रुग्णालयात
मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनात जखमी झालेल्या २० ते २५ लोकांना नवी मुंबतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांचा खर्च सरकार करणार आहे.
-
९० टक्के घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली
रायगड जिल्ह्यातील इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी अंतरावर मोरबे धरणाच्या वरच्या भागात इर्शालवाडी हे आदिवासी बांधवांचं गाव आहे. या गावात आदिवासी ठाकूर समाजाची अनेक घरं आहेत. ही घरं भूस्खलनात गाडली गेली आहेत. प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील ९० टक्के घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.
मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे
या भागत मुसळधार पाऊस असून मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर एपीआय खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौकजवळ इर्शाळवाडी इथे तात्पुरता