शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात धार्मिक वाद होतात, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने केला आहे. असे वादग्रस्त विधाने करत असल्याने संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मोठी मागणी संभाजी ब्रेगडच्या वतीने करण्यात आली आहे. संभाजी भिडे उद्या शुक्रवारी (ता. १४) नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथेही भिडे वादग्रस्त विधान करण्याची शक्यता आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडच्या वतीने भिडे यांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. याबाबत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची माहितीही ब्रिगेडच्या वतीने दिली आहे.
याबाबत संभाजी ब्रेगडच्या चे संकेत पाटील म्हणाले, “संभाजी भिडे यांनी यापूर्वी देशद्रोह होईल अशी विधाने केलेली आहेत. आता त्यांचा कार्यक्रम नांदेडमध्ये होत आहे. यावेळी भिडे वादग्रस्त विधान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शांत असलेला महाराष्ट्र हा पुन्हा अशांत होईल. या पार्श्वभूमीवर नांदेडमधील भिडे यांचा कार्यक्रम रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.”दरम्यान, पुणे येथे संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्य दिनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. तर १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. त्यामुळे सर्वांनी या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. हा काळा दिवस आहे.”