अलीकडचे काँग्रेसचे वातावरण पाहता काँग्रेसमधून कोणी राष्ट्रवादी (NCP) किंवा इतर पक्षांमध्ये जाईल अशी स्थिती वाटत नाही. उलट काँग्रेसमुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते EKNATH KHADSE म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.काही दिवसांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी किंवाBJP कोणी काँग्रेसमध्ये गेले तर आश्चर्य वाटून घेवू नका, असे सूचक वक्तव्य खडसे यांनी केले. सध्या तरी राज्यात कुणी काय बोलावे याचे बंधन राहिले नाही. कुणी सैतान म्हणतात कुणी पप्पू म्हणतो तर कुणी काहीही बोलतात, असा चिमटा त्यांनी राजकीय नेत्यांना काढला. राजकारणाचा स्तर इतका खाली गेला की जनमानसमध्ये चीड आणि किळस निर्माण झाली, अशा शब्दांत खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.राजकारणात काहीतरी स्टॅंडर्ड असला पाहिजे. शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष SHARAD PAWAR यांचा राजकीय जीवन आणि उंची लक्षात घेता असे शब्द वापरणे योग्य नाही, असा टोला त्यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. शरद पवार यांनी अनेकांना मंत्री केले. त्यामुळे अशा पद्धतीचे शब्द उच्चारण योग्य नाही मी त्याचा निषेध करतो, असेही खडसे म्हणाले.मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पाटील हे अजित पवार यांच्या सोबत आहेत. स्वाभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला आवाहन करतात. याचा अर्थ असा आहे की अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेले नाहीत.
त्यामुळे पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. अजित दादांना त्यांना दाखवून द्यायचे आहे, की माझ्यासोबतही मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न दिसतो. मात्र, दुर्दैवाने अजून तरी त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही, असे उत्तर मंत्री पाटील यांच्या अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याच्या आवाहनावर खडसे यांनी दिले.मी भाजपामधून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. अनिल पाटील सुद्धा भाजपातच होते. मात्र, गेल्या काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटन मजबूत झाली आहे. मात्र, २०१९ नंतर निवडणुका झाल्या नाहीत. आता आगामी निवडणुकांमध्ये कोणाची ताकद किती आहे हे कळेल, असे आव्हान खडसे यांनी मंत्री अनिल पाटील यांना दिले.