• Wed. Jun 25th, 2025

दिल्लीतील बैठकीत काय घडलं? लोकसभेसाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी दिला सल्ला

Byjantaadmin

Jul 11, 2023

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल तसेच राहुल गांधी देखील या बैठकीत हजर होते. या बैठकीत राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील २५ नेते बैठकीला उपस्थित होते NANA PATOLE   बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, वर्षा गायकवाड, अमित देशमुख हे नेते यावेळी उपस्थित होते.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, लोकसभेच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचं, यावर बैठकीत चर्चा झाली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्र काँग्रेसचा आढावा घेण्यात आला.
भाई जगताप म्हणाले, देशाचे भवितव्य वाचवायचे असेल, तर २०२४ च्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व नेत्यांनी कंबर कसली आहे.

SHIVSENA आणि राष्ट्रवादीमध्ये नवीन परिस्थीती निर्माण झाली आहे. काँग्रेसला आता नवीन जागा निर्माण करणार आहे. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे वरिष्ठांनी सांगितले. काँग्रेस चांगल्या जागा लढवणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. के सी वेणुगोपाल म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली.4 तास महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत चांगला अनुभव आला. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना आपण निवडणूक कशा जिंकू शकतो हे सांगितलं

प्रदेशाध्यक्ष बदलणार?

दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रदेशाध्यक्ष न बदलण्याची हायकमांडची मानसिकता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नाना पटोले यांचं काँग्रेस पक्षाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीला आणखी मजबूत करण्याची काँग्रेसची भूमिका आहे.इतकेच नाही तर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येणार आहे. हे पद काँग्रेसमधील कोणत्या नेत्याकडे सोपवलं जाईल यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्षनेते पद कोणाकडे जाणार?

राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदारांच्या संख्येनुसार विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. दरम्यान या पदासाठी काँग्रेसमधून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार या नावांची चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *