शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असतांना राष्ट्रवादीचे ३२ आमदार अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाले अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले आणि राज्याला पहिल्यादांच दोन उपमुख्यमंत्री लाभले
मात्र याचाच आदर्श घेत आता गावपातळीवरच्या राजकारणात देखील दोन उपसरंपच नेमण्याची परवानगी द्या, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या मनूर येथील माजी सरपंचाने CM SHINDE यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची परवानगी राजीव साळुंके यांनी केली आहे.जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो.आपण केलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या धर्तीवर आता गावाच्या भल्यासाठी दोन उपसरपंच निवड करता यावी. त्यामुळे यावर सकारात्मक चर्चा करून, कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती साळुंके यांनी निवेदनात केली आहे.