• Sat. Jun 28th, 2025

शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रेबाबत कधीपर्यंत निर्णय घेणार? राहुल नार्वेकर म्हणाले…

Byjantaadmin

Jul 4, 2023

एकनाथ शिंदे यांनी एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंड केलं होतं. या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी १६ आमदारांना अपात्र केलं होतं. त्याविरोधात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी यावर निकाल दिला नाही. पण, अपात्रतेबाबत कधीपर्यंत निर्णय देणार? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.

rahul narvekar and eknath shinde and uddhav thackeray (1)

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सांगितलं की, निर्धारित वेळत याचा निर्णय द्यावा. लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत आम्ही निर्णय देऊ,” असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.जून महिन्यात राजकीय पक्ष कोणाकडे होता? हे पाहण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यावर आतापर्यंत कोणता निर्णय घेतला गेला? असे विचारल्यावर राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “राजकीय पक्ष कोणता आहे, हे पहिल्यांदा आम्हाला पहावे लागेल. त्यानंतर shivsena पक्षाचे नेतृत्व कोण करते आहे? पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नेतृत्व योग्य आहे का? हे पाहूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निर्णय घेताना घाईही करणार नाही. आणि विलंबही लावणार नाही.”

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना लवकरात-लवकर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *