• Sun. Jun 29th, 2025

अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा शब्द!

Byjantaadmin

Jul 3, 2023

सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजितदादांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शरद पवार कराडमध्ये प्रीतीसंगमावर दाखल झाले असून, यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय भाकित वर्तवलं.शरद पवारांना समर्थन देण्यासाठी आम्ही प्रीतीसंगमावर आलोय. ते आमच्या गावी आले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे आहोत. शरद पवार हे विरोधीपक्षांच्या आघाडीत भक्कमपणे आहेत. महाविकास आघाडी आहे तशीच राहणार आहे. काही माणसं गेली आहेत, त्यामुळे तेवढा परिणाम होईल, पण तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत, तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

मी जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो. काही महिन्यांपासून वाटाघाटी चालू होत्या, की काय घ्यायचं. असं घडतंय हे माहिती होतं. अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द असल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन किंवा अध्यक्षांकडून त्यांच्या विरोधात निकाल घेऊन अजित पवारांना मुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. मात्र आम्ही ताकदीने भाजपविरोधात लढत राहू, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

ही राजकीय पूर्वतयारी

“शिवसेनेमध्ये जी फूट झाली. पक्षांतर झाले. ज्यांनी बंड केले, त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 16 जणांवर खटला सुरू आहे. त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्यास नकार दिला आणि ते प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवले आहे, याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष यांना निर्णय द्यायचा आहे. हा निर्णय 10 ऑगस्ट 2023 पर्यंत द्यावा लागणार आहे. हा निर्णय अध्यक्षांना लांबवता येणार नाही. या निर्णयात 16 जणांचे निलंबन करावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद रिक्त होतय. त्याची ही पूर्वतयारी आहे. तो निर्णय उद्या- परवा ही ते देऊ शकतात. निर्णय हा सूर्यप्रकाशाएवढा स्पष्ट आहे. किती दिवस लांबवण्याचा हा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे ती पूर्वतयारी आहे.” असं पृथ्वीराज चव्हाण काल म्हणाले होते.जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले की, हा निर्णय अजित पवार यांच्यामुळे घेतला आहे. जो त्यांनी त्रास दिला, त्याला आम्ही कंटाळून आणि निधीच्या वाटपावरून अथवा इतर गोष्टींमुळे असेल. आता त्याच अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदी हाताखाली शिवसेनेचे आमदार काम करणार आहेत. त्यांच्या शपथविधीच्या वेळी त्यांचे चेहऱ्यावरील भाव पाहिले आपण. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अथवा गटातील आमदार, मंत्री असतील यांच्या चेहऱ्यावरून भाव स्पष्ट दिसत होते, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *