शिरुर अनंतपाळकरांच्या पाण्यासाठी निलंग्यातील महाविकास आघाडी व सामाजिक संघटना सरसावल्या
निलंगा-शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पातुन मिळणारे पिण्याचे पाणी व शेतीसाठी लागणारे पाणी विनापरवानगी लातुरला पळवुनन घेऊन जात असल्याचे समजताच गेल्या सहा दिवसांपासून लोकनेते विकासरत्न डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समिती च्या वतिने धरणे आंदोलन रास्तारोको अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.
त्याचाच भाग म्हणून निलंगा विधानसभा मतदार संघातील शिरुर अनंतपाळ तालुका व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पुढील दुरदृष्टी ठेवून या मध्यम प्रकल्पाची निर्मिती केली त्याची क्षमता विस दशलक्ष घन मीटर असल्याने ते पाणी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील व चाकुर तालुक्यातील लोकांना शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु सदरील ठेकेदार त्या मागें असलेली अदृश्य शक्ति यांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व जलसंपदा विभागाची कुठलीच रितसर परवानगी न घेता विहिर खोदने पाईपलाईन करने हे बेकायदेशीर असल्याने ते तात्काळ रद्द करुन शिरुर अनंतपाळ व परिसरातील गावांना त्यांच्या हक्काचे पाणी त्यांनाच मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अश्या आशयाचे निवेदन निलंगा तालुका महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा याना देण्यात आले!!
या निवेदनावर जि.प चे माजी अध्यक्ष पंंडीतरावजी धुमाळ, अशोकराव पाटील मित्रमंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रा दयानंद चोपने, शिवसेना (ऊबाठा) जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ सगरे, माजी नगराध्यक्ष हमीदभाई शेख,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, निलंगा तालुका कॉंग्रेस कमिटीचे कार्यअध्यक्ष नारायण सोमवंशी,
फुले शाहू चॅरिटेबल व वेलफेयर फाऊंडेशन चे जिल्हा अध्यक्ष देवदत्त सुर्यवंशी,सचिव साहेबराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष मुजीब सौदागर, विर लहुजी सेना मराठवाडा कार्य अध्यक्ष गोविंद सुर्यवंशी, गणराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता सुर्यवंशी, अल्पसंख्याक कॉंग्रेस सेल चे अध्यक्ष लालापटेल, बौद्ध महासभेचे अध्यक्ष रोहित बनसोडे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील, टिपुसुलतान संघटनेचे सबदर काद्री, व्यंकटराव पांचाळ अंगद जाधव, रोहण सुरवसे, अजय कांबळे,तुषार सोमवंशि व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.